समर्थांची करुणाष्टके (५) कडवे अकरावे...

समर्थांची करुणाष्टके (५)

कडवे अकरावे...

समर्थ म्हणतात...

संसार नेटका नाहीं..
उद्वेग वाटतो जिवी..
परमार्थ आकळेना कीं..
बुद्धि दे रघुनायका...!

रामराया..मला कळतय संसार म्हणजे साकल्य बुद्धीने जीवनरहाटी समजली जाते.ती सफलतेने  पुरी होणं महत्वाच आहे.तो संसार सफल होण्यासाठी सहजता जरुरी आहे.पण ती येत नाहीये.नाती आहेत पण परमसुख मिळत नाही..साधन आहेत पण समाधान नाही..समाज आहे पण समाजाभिमुखता नाही...!आणि तस नसल्याने एकप्रकारची निरिच्छता,उद्वेगता निर्माण होत चाललेली आहे.जिथं संसार,प्रपंच जमत नाही..त्यामध्ये नानाप्रकारच्या शंका,कुशंका असतात..तिथं परमार्थाची वाट कशी जमू शकेल..?

रामराया..या परमार्थाच,प्रपंचाच सकळ आकलन होऊन तो माझ्या मनात,देहात,आयुष्यात सदृढपणे रहावा अशी बुद्धि मला देशील ना..?

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment