समर्थांची करुणाष्टके (५) कडवे तिसरे.

समर्थांची करुणाष्टके (५)

कडवे तिसरे.

समर्थ म्हणतात..

अन्न नाही वस्त्र नाही..
सौख्य नाही जनामध्ये..
आश्रयो पाहता नाही..
बुद्धी दे रघुनायका...!

रामराया..उदरभरण करण्यासाठीचा प्रपंच मला साधता येत नाहीये.तुझ्या भक्तीशी रमलेला,त्यातच गुंतलेला मी असल्यामुळे हा व्यावहारिक प्रपंच मला साधता येत नाहीये. मला अन्न,वस्त्र याची आवश्यकता,निकड पुरवता येत नाहीये.अर्थात अस विदेही होणं हे चांगलंच पण  ते सुद्धा मला साधलेल नाही.मी एकसारखा तुझ्या नामात,तुझ्या दर्शनाच्या धुंदीत असल्याने समाजामध्ये मला सुख मिळेनास झाल आहे..किंबहुना ते मला आवडेनास झालं आहे.
त्यामुळे मी धड तुझा नाही अन त्या भौतिक सुखाचा,समाजाचा नाही..अशा एका द्वैत स्थितीत आलो आहे..!
मला यातून बाहेर येण्याची..सफल बुद्धी रामराया मी तुझ्याकडे मागतोय..देशील ना..?

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment