समर्थांची करुणाष्टके (५) कडवे दहावे...

समर्थांची करुणाष्टके (५)

कडवे दहावे...

समर्थ म्हणतात...

कळेना स्फूर्ति होईना..
आपदा लागली बहू..
प्रत्यही पोट सोडीना..
बुद्धि दे रघुनायका...!

रामराया..मला तुझं गुणगान करताना आंतरिक ऊर्जा,प्रतिभा ही आवश्यक आहे.मी हे करताना येणारी मानसिक,भौतिक,सामाजिक संकट,विघ्न ही वाढत चाललेली आहेत.हे सगळं आहेच याशिवाय माझे  शरीरधर्म,भूक माझी पाठ सोडत नाहीये.हे सगळं भागवण्यासाठी,शमवण्यासाठी जी लागते ती धडपड,अर्थार्जना साठी काहीसा कासावीसपणा मला तुझ्या उपासनेपासून लांब न्हेऊ पहातोय.
रामराया..मला या सगळ्याबद्दलची सम्यक दृष्टी आणून ह्या सगळ्याला दुय्यमता आणून तुझ्या उपासनेची दृढ बुद्धी दे रे..!!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment