समर्थांची करुणाष्टके (५) कडवे चौथे...

समर्थांची करुणाष्टके (५)

कडवे चौथे...

समर्थ म्हणतात....

बोलता चालता येना...
कार्यभाग कळेचिना..
बहुत पीडिलो लोकी...
बुद्धी दे रघुनायका...!

रामराया...माझी व्यक्तता ही तुझ्यापर्यंत,समाजापर्यंत पोहचू शकत नाहीये.कदाचित तुझ्या कृपेमुळे येणारी उत्कटता  अजून पूर्ण जागी होत नाहीये.त्यामुळे या जन्मी येऊन जे माझं इतिकर्तव्य आहे त्याचा ही यथोचित मला बोध होत नाहीये.
माझं मन आणि भोवतीचा समाज या दोन टोकामध्ये सांधता सांधता मला मी समाजापासून दुरावलो जातोय अस वाटू लागलं आहे..!त्यातून मला समाजापासून पीडा होतीये असा आभास होतोय..!
पण रामराया,मला तस काहीही नाहीये हे समजण्याची बुद्धी तुझ्यामुळे मिळतीये पण ते वळण्याचीही देशील ना??

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment