समर्थांची करुणाष्टके (४), कडवे आठवे.

समर्थांची करुणाष्टके (४)

कडवे आठवे.

समर्थ म्हणतात...

समर्थापुढे काय मागो कळेना..
दुराशा मनी बैसली हे ढळेना..
पुढे संशयो नीरसी सर्व चिंता..
रघुनायका मागणे हेंचि आता..!

रामराया...मला कधीकधी माझं हसू येत..मी जगन्नाथासमोर किती किरकोळ आणि सलग मागण्या करतोय..!तुझ्यासारख्या दयावंतापुढे मी काय मागायचं या बद्दल पूर्ण अनभिज्ञ आहे..!

रामराया...या कायमच्या आशंकांमुळे मला कधी कधी तुझें प्राप्तव्य मिळेल की नाही याबद्दल अनिश्चितता मनात येत रहाते...!

रामराया...आता तरी यापुढे तू माझ्या मनातले हे सगळे संशय,सगळे व्यत्यय नाश करून टाक..म्हणजे मला तुझ्याशी एकत्व जोडता येईल..!

रामराया..हे सगळं मला आत्मसात करता याव असा आशीर्वाद मला तुझ्याकडून मिळावा ह्याची मनापासून मागणी मी तुझ्याकडे वारंवार करतोय..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment