समर्थांची करुणाष्टके (४)
कडवे सातवे.
समर्थ म्हणतात...
मनी कामना कल्पना ते नसावी..
कुबुद्धी कुडी वासना निरसावी..
नको संशयो तोडी संसारवेथा..
रघुनायका मागणे हेचि आता...!
रामराया...मनाची द्विधा अवस्था तुला काय सांगू..?आयुष्यातील अनेक भ्रामक इच्छांनी आणि त्या पूर्ण होत नसतील तर त्याच्या कल्पनाविलासानी उन्नत होणार मन मला आता नको आहे रे...!
रामराया..अशा कामना पूर्ण करण्यासाठी येनकेन प्रकार अवलंबावे लागतात..असात्विक विचार,कृती करायला लागतात..आणि त्यातून जी वाईट इच्छा निर्माण होते ती वासना..या सगळ्याचा मला तिटकारा आलाय..त्यातून मला आता बाहेर घे रे..!
रामराया..मला आता कुठल्याही दोलनामय अवस्थेत,मोहपाशाच्या गुंत्यात रहायच नाहीये..माझ्या मनात कोणताही त्याबाबतीत संदेह नाही..आणि जर माझ्या नकळत जर तो राहिला असेल अस तुला वाटत असेल तर तो तू पूर्ण छेदून टाक..!!
रामराया..या सगळ्या अनेक अशा चक्रव्यूहातून मला तू अलगद बाहेर घेऊन तुझ्या कुशीत घे हेच मागण आहे माझं...!
समर्थ आता स्वतःची भक्ती निरक्षीर विवेकाने तपासून पाहू लागले आहेत..!त्यांना समजू लागले आहे की या आपल्या उपासनेत नक्की कशाची बाधा कायम रहाणार आहे..!आणि ती बाधा नाश करण्यासाठी समर्थ रामरायाला ही मागणी करतायत..!आपल्याला ही निरक्षीर बुद्धी यायला पाहिजे होय ना..?
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
कडवे सातवे.
समर्थ म्हणतात...
मनी कामना कल्पना ते नसावी..
कुबुद्धी कुडी वासना निरसावी..
नको संशयो तोडी संसारवेथा..
रघुनायका मागणे हेचि आता...!
रामराया...मनाची द्विधा अवस्था तुला काय सांगू..?आयुष्यातील अनेक भ्रामक इच्छांनी आणि त्या पूर्ण होत नसतील तर त्याच्या कल्पनाविलासानी उन्नत होणार मन मला आता नको आहे रे...!
रामराया..अशा कामना पूर्ण करण्यासाठी येनकेन प्रकार अवलंबावे लागतात..असात्विक विचार,कृती करायला लागतात..आणि त्यातून जी वाईट इच्छा निर्माण होते ती वासना..या सगळ्याचा मला तिटकारा आलाय..त्यातून मला आता बाहेर घे रे..!
रामराया..मला आता कुठल्याही दोलनामय अवस्थेत,मोहपाशाच्या गुंत्यात रहायच नाहीये..माझ्या मनात कोणताही त्याबाबतीत संदेह नाही..आणि जर माझ्या नकळत जर तो राहिला असेल अस तुला वाटत असेल तर तो तू पूर्ण छेदून टाक..!!
रामराया..या सगळ्या अनेक अशा चक्रव्यूहातून मला तू अलगद बाहेर घेऊन तुझ्या कुशीत घे हेच मागण आहे माझं...!
समर्थ आता स्वतःची भक्ती निरक्षीर विवेकाने तपासून पाहू लागले आहेत..!त्यांना समजू लागले आहे की या आपल्या उपासनेत नक्की कशाची बाधा कायम रहाणार आहे..!आणि ती बाधा नाश करण्यासाठी समर्थ रामरायाला ही मागणी करतायत..!आपल्याला ही निरक्षीर बुद्धी यायला पाहिजे होय ना..?
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment