समर्थांची करुणाष्टके (५) कडवे एकोणिसावे.

समर्थांची करुणाष्टके (५)

कडवे एकोणिसावे.

समर्थ म्हणतात..

आशा ही लागली मोठी.
दयाळुवा दया करी..
आणिक नलगे काही..
बुद्धि दे रघुनायका...!

रामराया..मनुष्याचा स्थायीभाव आहे.तो आशावादी आहे.मी ही त्याला अपवाद नाहीये.मला ही आशा फक्त तुझ्या समचरणी एकरूपतेची आहे.
आता तू मला आणखी प्रतीक्षा करायला लावू नको.मला माहिती आहे तू दयाळू असल्यामुळे तू मला जास्त वाट बघायला लावणार नाहीस.तुझ्या कृपेची अश्वस्तता याशिवाय मला कोणतीच वांछा नाहीये.अशी कृपा,अशी करुणा तू माझ्यावरही करशीलच.

फक्त मला तोपर्यंत धीर धरायची बुद्धि दे रे रघुनायका...!!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment