समर्थांची करुणाष्टके (६) कडवे नववे.

समर्थांची करुणाष्टके (६)

कडवे नववे.

समर्थ म्हणतात..

भजो काय सर्वापरी हीण देवा..
करू काय रे सर्व माझाची ठेवा..
म्हणो काय मी कर्मरेखा न लोटे..
उदासीन हा काळ कोठे ना कंठे..!

रामराया..मी तुझं पूजन,अर्चन करतो..तुझ्यासमोर उपासना करतो,संकीर्तन ऐकतो पण हे सगळं करून सुद्धा मी तुझ्या इतर भक्तांची तुलना करतो तेंव्हा माझ्या या सगळ्या उपासनारुपी पूजनाची मर्यादा माझ्या लक्षात येऊ लागते.माझी बौद्धिक हिनता जाणवू लागते..!

रामराया.. मला माहित आहे माझ्यातल्या गुण-दोषानुसार मला प्राप्त होत आहे.माझ्या कर्तृत्वानेच मी माझं उणेपण ओढवून घेतलं आहे.माझ पूर्वसंचित कमी पडतंय म्हणून तुझं सस्वरूप दर्शन अजून होत नाहीये..!

रामराया...माझं हे कर्मानुसार मिळणार फळ मी भोगतो आहे.मी कितीही प्रयत्न केला तरी ही माझी कर्मरेखा उलटत नाहीये.किंव्हा तुझं दर्शन मिळण्याइतपत सुकर होत नाहीये.

रामराया..या सगळ्या मानसिक जडणघडणी मध्ये माझं मन तुझ्या प्राप्तीशिवाय अतिशय उदासीन रहाते आहे.आणि तसच निरस माझं आयुष्य जगायला लागत आहे.

समर्थ आपण करत असलेल्या उपासनेची काही वेळा वाटणारी मर्यादा इथे सांगतात.ही मर्यादा पूर्वकर्म आणि दुष्कृतामुळे अशी रहाती आहे की काय अशी शंका ते  रामाला विचारून त्यातून तरून जाऊन रामस्वरूप भेटावे अशी प्रार्थना रामाकडेच करतात..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment