समर्थांची करुणाष्टके (५) कडवे सहावे...

समर्थांची करुणाष्टके (५)

कडवे सहावे...

समर्थ म्हणतात..

नेटके लिहिता येना..
वाचिता चुकतो सदा..
अर्थ तो सांगता येना...
बुद्धि दे रघुनायका....!

रामराया....ऋषीमुनींनी लिहून ठेवलेल,महानुभवांनी जपलेल अस अध्यात्म,आचारग्रंथ मी माझ्या मनपटलावर उतरवू पहातोय तेही निर्दोषरित्या जमत नाहीये..!लिहिलेलं ,आठवलेलं मनाला वाचून सांगावं तर ते ही मन द्विधा असल्यामुळे जमत नाहीये..!या सगळ्याचा एक अर्थ तो म्हणजे तुझ्या भक्तीची मी केलेली अनास्था,हे सुद्धा मला माझ्या मनाला पटवून देता येत नाहीये..!
रामराया..इतक्या दोलनामय टोकावर मी उभा आहे की तू जर मला याबद्दल मार्गदर्शन केलं नाहीस..तू शिक्षित केलं नाहीस तर मी काय करू..?म्हणून मला त्यासाठी योग्य ती बुद्धी देशील ना..?

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment