समर्थांची करुणाष्टके (६) कडवे पहिले...

समर्थांची करुणाष्टके (६)

कडवे पहिले...

समर्थ म्हणतात..

समाधान साधुजनांचेनि योगे..
परि मागूते दुःख होते वियोगे..
घडीने घडी सीण अत्यंत वाटे..
उदासीन हा काळ कोठे न कंठे..!

रामराया..साधुसंत,सज्जन यांच्या संगतीची बहार ही वेगळीच.धर्मक्षेत्र, तीर्थक्षेत्र,देवक्षेत्र याठिकाणी असणारे त्यांचे लाभणारे सहवासाचे सुख,त्यांची शिकवण हे सारे केवळ आणि केवळ सुखाचे झरे असतात.

रामराया..संसारातून,प्रपंचातुन काहीकाळ या महाभागांच्याजवळ सहवासात,सान्निध्यात जाऊन पुन्हा त्याच प्रपंचात परत यावं लागत..कर्तव्यापोटी.अशा  त्यांच्या सुखसंगाच्या नंदनवनातून माघारी येणं, त्या पायऱ्या खाली उतरण  केवळ क्लेशदायक होत.

रामराया..त्यानंतरची त्या स्थानाची ओढ आणि पुन्हा त्याच संतचरणी पुन्हा परतण्याची जी एकसंध हुरहूर लागून रहाते.ती माझ्यासारख्याला खूप जाणवते..त्यामुळे मला या प्रपंचात कोणताही रस उरत नाही.माझा हा  प्रपंच निरस होऊ लागला आहे.

रामराया..या सगळ्यामुळे एकप्रकारची विकल अवस्था मनाची झाली आहे.निरस झालो आहे.मला हे आयुष्य असार वाटू लागल आहे..!

आपण ही अशा अवस्थेत अनेकवेळा जातो..नाईलाजाने परत आपल्या प्रपंचात येतो..!आणि या येरझाऱ्यातून स्वतःची दमणूक करून घेतो.असा काळक्रमण करणं अवघड होतं जात.याला उपाय एकच..गुरुचरणी अखंड अढळपद..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment