समर्थांची करुणाष्टके (६)
कडवे सातवे.
समर्थ म्हणतात..
समर्था मनी सांडि माझी नसावी..
सदा सर्वदा भक्तचिंता असावी..
घडेना तुझा योग हा प्राप्त कोठे..
उदासीन हा काळ कोठे न कंठे..!
रामराया...तू एकमेव,अद्वितीय आहेस.तू कृतसमर्थ आहेस.या साऱ्या चरचराचा तू स्वामी आहेस.रामराया..मी या तुझ्या भवसागराचाच एक भाग आहे ना..?मग माझ्याकडे तू दुर्लक्ष करू नकोस..!
रामराया..तुझ्या मनात तुझ्याच किर्तीप्रमाणे भक्तचिंता असते..!भक्तांच्या दुःखांचा,चिंतेचा तू हारक आहेस.तीच तुझी भक्तपालक म्हणून चिंता माझ्यासाठी दाखवशील ना..?
रामराया..मला माहिती आहे की प्रत्येक गोष्टीसाठी एक ठराविक वेळ असते.एक निश्चित कृपेचा मुहूर्त असतो.तो निश्चित तपाने,उपासनेने थोडा समीप येतो..!मला अजून कळत नाहीये की माझी उपासना फलद्रुप होण्याचा क्षण,मुहूर्त,योग नक्की केंव्हा आहे..?
रामराया..तो योग,ती वेळ येईपर्यंत जो उदासीन किंव्हा प्रतिक्षेचा काळ आहे तो काळ सहजतेने संपावा..आणि तोपर्यंत उपासनेशी दृढ रहायची बुद्धि तूच मला दे..!!
समर्थ निकराने रामदर्शनाचा हट्ट रामरायाकडेच करतायत.रामरायांच लक्ष माझ्याकडे आहेच..पण तो रामराय मला त्याच्या स्वरूपात घेत नाहीये.त्यासाठी ठराविक वेळ लावतोय याचीही जाणीव त्यांना आहे.आणि तशी ती वेळ असते याची जाणीव ते आपल्याला ही करून देतायत..!
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment