समर्थांची करुणाष्टके (७) कडवे चौथे..

समर्थांची करुणाष्टके (७)

कडवे चौथे..

समर्थ म्हणतात..

विचारे तरी अंतरी कोंड होतो..
शरीरास तो हेत सांडून जातो..
उपाधीस देखोनि वाटे सरावें..
रघुनायका काय कैसे करावे..!

रामराया.. खूप विचार करतोय.सगळ्या पद्धतीने माझी उपासना परिपूर्ण होण्यासाठी मी माझ्याभोवती असणाऱ्या अनेक ऐहिक भावनांना बाजूला करतोय.त्यासाठी लागणारा अट्टाहास, विचार करतोय.अशा सगळ्या विचारांचा एकप्रकारचा कोलाहल मनात चालू आहे.

रामराया..या सगळ्या मानसिक गोंधळामध्ये मी माझ्या जगण्याचा हेतू हा तुझी प्राप्ती आहे,हे विसरून जाईन की काय या साशंक मनाने वावरतोय..!

रामराया..या माझ्या जगण्यात तुझ्या दर्शन,प्राप्तीच्या मध्ये कोणतीही भावनिक,सामाजिक उपाधी जडू नये यासाठी आतिशय सावध माझी वाटचाल करतोय..!

रामराया..सांग ना?मी करतोय, आचरण करतोय हे सगळं बरोबर करतोय ना..?का हे तुझी प्राप्ती होण्यासाठी तू मला आणि काही सुचवू पहातोयस..?

समर्थ उपासना आणि  त्यासाठी स्वगुण परीक्षा याची उत्तम सांगड घालून परमेश्वर यथोचित दर्शनाची वाट सुकर करू पहात आहेत.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment