समर्थांची करुणाष्टके (७) कडवे तिसरे..

समर्थांची करुणाष्टके (७)

कडवे तिसरे..

समर्थ म्हणतात..

अवस्था परी होय नाना परीची..
किती काय सांगो गती अंतरीची..
विवेकेचि या मानसा आवरावे..
रघुनायका काय कैसे करावे..!

रामराया..खर सांगू..?मनाच्या अवस्था इतक्या वेगवेगळ्या होत चालल्यात कधी आनंद,कधी दुःख,कधी पश्चात्ताप,कधी अभिमान अश्या सगळ्या अवस्थातून मनाचा फेरा हा स्वतःचे हीत शोधू पहातोय..!

रामराया..या सगळ्यात मनाची अंतरिम स्थिती वेगळीच जाणवतीये..!ती कुणाला सांगू ही शकत नाहीये.वर तुझ्यापाशी व्यक्त केलेल्या प्रत्येक भावविश्वातून रंगून सुद्धा एकप्रकारचा एकटेपणा जाणवतोय.

रामराया..तूच आता तुला प्राप्त असलेली सारासार विवेकबुद्धी माझ्या मनातही  जागी करून मला या भावकल्लोळातून तुझ्या मार्गावर आणशील ना..?

रामराया..हे सगळं साधण्यासाठी,यातलं गौप्यगुह्य अस भक्तीशास्त्र कळण्यासाठी मी काय करावे हे तू सांग ना..?

समर्थांच्या वाणीला एकप्रकारची चौकस पण अतिविश्वासु अशी बैठक आहे.श्रद्धा आहे..!त्या श्रद्धेतून समर्थ रामाकडे मार्गदर्शन मागतयात..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment