*समर्थांचे साहित्यविश्व.*
*अभंग ३*
*भाग १*
*देव जवळी अंतरी.|*
*भेटि नाही जन्मभरी||१||*
*मूर्ती त्रैलोकी संचली.|*
*दृष्टी विश्वाची चुकली ||२||*
समर्थ म्हणतात..
देव म्हणून जी संकल्पना आहे ते चैतन्य आहे.ओज आहे.जे दाखवता येत नाही,पहाता येत नाही..ते फक्त जाणवत.ते सभोवती असत.कायम असत.ते आत,शरीरात जीव म्हणून आणि शरीराबाहेर पंचमहाभूते होऊन असत.
समर्थ म्हणतात..
पण आपण इतके मुढ आहोत की इतक्या जवळ सर्वव्यापी असून ही तो आपल्याला कळत नाही.जाणवला तरी त्याची असण्याची खात्री पटत नाही कारण तो अमूर्त असतो.तो मूक असतो.पण सचेत असतो.
समर्थ म्हणतात..
त्रैलोक्य हे खरं म्हणजे देवाचच दृश्यरूप.तो देव या त्रैलोक्याचा निर्माता,पालनकर्ता आणि संहारकरता ही आहे.पण तो देव या त्रैलोक्याचा व्याप्ती व्यापून ही दोन अंगुळे उरला आहे.
समर्थ म्हणतात..
पण त्रैलोक्याचा स्वामी असलेल्या या देवाला हे सकल विश्व शोधते आहे.पण ते चुकीच्या पद्धतीने.तो देव माणसे आकारात शोधतात पण तो निराकार आहे.ऐहिकात शोधतात पण देव विदेही आहे.
समर्थ देवाच्या शोधासाठी निघालेल्या मानवाच्या मूढ बुद्धीच वर्णन करतायत.अंतर्मनातला देव शोधायचा सोडून बाहेर शोधणारा माणूस हा चुकीच्या पद्धतीनेच देव शोधतो.तो जवळच अंतरात आहे.हे मानवाला केंव्हा कळणार..?
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment