समर्थांचे साहित्यविश्व (अभंग ३) (भाग २)

*समर्थांचे साहित्यविश्व.*
*अभंग ३*

*भाग २*

*भाग्ये आले संतजन..|*
*झाले देवाचे दर्शन.||३||*
*रामदासी योग झाला..|*
*देही देव प्रकटला..||४||*

समर्थ म्हणतात..

सुसंगती ही आपल्या ललाटी लिहिलेली असायला लागते.संतसंग, सज्जनसंग, देवसंग हे सगळे संग नशिबाचा भाग आहेत.पूर्वपुण्याईने ते प्राप्त होतात.आणि यथायोग्य आयुष्याला वळण देतात.

समर्थ म्हणतात...

संतसंगती मिळाली की शुभ तेच आपल्या भोवती घडते.अवघाची शकुन असा जीवन प्रवाह होतो.कारण जिथे सत्य,सत्व आणि संत तिथे भगवंत.तो आपसूकच आपल्या सन्मुख येतो आणि दर्शन देतो.

समर्थ म्हणतात..

एकदा देव प्रसन्न झाला की हा देह त्याचा दास होऊन जातो.रामाच्या स्वरूप डोळे बघतात.हात त्याची पूजा करतात.कान त्याच संकीर्तन श्रवण करतात.वाणी त्याचा जयजयकार करते.असा अवघा देह रामदास होऊन जातो.

समर्थ म्हणतात..

देव जर मनात,तनात उमटू लागला,देहातून कीर्तनात थिरकू लागला.भजनात रंगू लागला,हा देह देवच होऊ लागतो.कारण देव शोधाया गेलो..देव होऊन गेलो ही अवस्था आपोआप निर्माण होते.

समर्थ मांडतात अवघा  आयुष्याचा प्रवाह.त्यातला भक्त प्रवाह फक्त आठ ओळींच्या अभंगात.देव कसा शोधावा?कुठे शोधावा ,तो शोधत असताना आपण चुकतो  कुठे..?हे सारं अभंगात ते वर्णन करून शेवटी ते स्वतः देवत्वाच्या पायरीपर्यंत स्वतःला घेऊन जातात.आणि तो रामराया आपल्याला समर्थांच्यात दिसू लागतो.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment