समर्थांचे साहित्यविश्व (अभंग ४) (भाग१)

*समर्थांचे साहित्यविश्व.*
*अभंग ४*

*भाग १*

*पांचा लक्षणी पूरता..*
*धन्य धन्य तोच ज्ञाता.*||१||
*विवेक वैराग्य सोडिना.|*
*कर्ममर्यादा सांडिना||२||*
समर्थ म्हणतात..

पंचेंद्रियातून निर्माण होणाऱ्या गरजा,मागण्या अमाप असतात.काहीवेळा अतिरंजितही असतात.त्या प्रपंच संपवत नाहीत आणि परमार्थ लाभू देत नाहीत.अशा साऱ्या पंचेंद्रिय सवयींना पुरून उरत असेल,तरच तो मनुष्य परमार्थाची कास धरू शकतो.

समर्थ म्हणतात..

असा जितेंद्रिय मनुष्य केवळ स्वतःच आयुष्य भक्तमय करत नाही तर अवघ कुळ,समाज तो पुनीत करून घेतो.असा पुरुष आतून,मनातून स्वच्छ होऊन केवळ ब्रम्हज्ञानाचा अधिकारी असतो.

समर्थ म्हणतात..

असा मनुष्य विकारविरहित झाल्याने मनोवृत्तीतूनही निर्मळ होतो.मन हे भक्ती साठी,स्पर्श पूजनासाठी,वाणी जपासाठी,नजर कैवल्यासाठी होऊन जाते.वागण्यात कोमलता आणि आचरणात वैराग्य दिसू लागते.

समर्थ म्हणतात..

असा मनुष्य जे कर्म करतो ते अलौकिक असते.सत्प्रवृत्त असते.पण ते कर्म करताना तो स्वतःचा कर्माभिमान बाजूला ठेवून कार्यवेगळा होऊन जातो.असे कार्य केंव्हा पुढील कार्यकर्त्याकडे द्यायचे याची विवेकबुद्धि तो जागी ठेवून त्या कार्याला स्वतःपुरती मर्यादा घालतो.

समर्थ उत्तम साधकाची ओळख सांगतात.पंचेंद्रियाच्या लोभावर विजय मिळवत असा साधक स्वतःचा जन्म धन्य करून घेतो.तो कार्यकर्ता,धर्मप्रतिपालक असतोच पण तो निस्पृह ही असतो.एखाद्या स्वनिर्मित कार्यातून स्वतःला वजा करून कार्य पुढे चालेल अशी अशी अखंड तजवीज करणारा हा साधक एक आदर्श घालून देतो.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment