*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग ८*
*भाग २*
*तोवरी तोवरी अत्यंत सद्भाव..|*
*विशेषे वैभव आले नाही..||३||*
*तोवरी तोवरी सांगे निराभिमान..|*
*देहाशी अभिमान आला नाही..||४||*
समर्थ म्हणतात...
मनुष्य सद्भावाचा पुतळा असतो,तो सगुणाचे गुण गात असतोतोपर्यंत तो मनुष्य केवळ आणि केवळ सरळ,साधा असतो.
जोपर्यंत त्याच्याकडे इतरांच्या पेक्षा जास्त, उल्लेखनीय धन,श्रीमंती,मानमरातब येत नाही.तो इतरांच्या पेक्षा जास्त काही कमवत नाही.मिळवत नाही तोपर्यंत.
समर्थ म्हणतात...
मनुष्य तोपर्यंत गर्वहरणाचे,निस्पृहते चे गोडवे इतरांसाठी गातो.त्याची महती त्याच्या तोंडात असते.
जोपर्यंत त्याच्या मनात स्वतःच्या शरीराबद्दल ममत्व निर्माण होत नाही.स्वतःच्या अस्तित्वाबद्दल त्याला अभिमान होत नाही.
समर्थांनी मनुष्याच्या स्वभावाचे चूक असणारे बारकावे हेरून त्यावर सुधारणा करण्यासाठी या अभंगात टीका केली आहे.त्यायोगे मनुष्य आपल्यात सुधारणा करू शकेल.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment