समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*विधिकुळभूषणाचे धाम सर्वागुणांचे..|*
*भरण अभरणाचे सर्वलावण्य साचे..|*
*सुख परमसुखाचे ध्येय ब्रह्मदिकांचे..|*
*भजन हरीजनाचे गुज हे सज्जनांचे..||*

समर्थ म्हणतात..

आचार,विचारांनी युक्त असे ज्याचे कुळ आहे.अशा समस्त कुळाला ही जो राम भूषणावह आहे.असा राम जो सर्वगुणांचा एक समुच्चय आहे.एक ठिकाण आहे जिथे या सर्व उत्तम गुणांचा सहज वावर असतो.

समर्थ म्हणतात..

ज्या रामरायांच्या शरीरावर जन्मतःच तेज आहे.देवत्व आहे.याशिवाय त्याच हे मुग्ध पुरुषी शौष्ठव अनेक अशा आभूषणाने अजूनच तेजाळून उठलं आहे.त्याच मनोहारी दर्शन अजूनच सुखदायी होत चालल आहे.

समर्थ म्हणतात..

हे सुख जे रामाचे अस्तित्व आहे..!किंव्हा ज्या अस्तित्वात रामाच वास्तव्य आहे ह्याचा चिरंतन शोध अनेक तापसी संत,महंत, मुनिश्रेष्ठ च नाही तर अनेक देव ही त्या रामाच्या  आश्रयाची,कृपेची,त्याच्या ठायी असलेल्या उत्तम सुखप्रवृत्तीची आस धरून आहेत.

समर्थ म्हणतात..

ह्या सगळ्याची आस, ध्येय असलेले जे सज्जन मनुष्य आहेत त्यांना हे सगळं प्राप्त होण्यासाठी एकच सोपा साधा मार्ग आहे तो म्हणजे हरिकीर्तन,रामसंकीर्तन..!ज्यायोगे हे सगळं रामसुख सज्जनलोक प्राप्त करून घेतात.घेऊ शकतात.

समर्थ सज्जनांच्या सज्जन मतीच गुज इथे वर्णन करतात.ते ज्याच्यामुळे त्यांच्या मनात तेवत असत त्या रामसंकीर्तनाची महती आणि रामअस्तित्व इथे वर्णन करून सांगतात.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment