*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग ८*
*भाग ३*
*तोवरी तोवरी धीरत्वाची मात..*
*प्रपंची आघात झाली नाही.||५||*
*रामदास म्हणे अवघेची गाबाळी.|*
*ऐसा विरळा बळी धैर्यवंत..||६||*
समर्थ म्हणतात..
मनुष्य तोपर्यंत धीर वगैरेंच्या गोष्टी करतो.सहनशीलता,शांतता,संसारखेळ यांची महती गातो.
जोपर्यंत त्याच्या स्वतःच्या आयुष्यात,प्रपंचात संकट येत नाही.अपेक्षेप्रमाणे नाही घडलं तर निराशा येत नाही.जोपर्यंत नाती गोती त्याच्या वैयक्तिक अपेक्षा पूर्ण करत नाहीत.
समर्थ म्हणतात...
इथं या संसारचिंतेत गुरफटलेले,गळफटलेले कधीकधी मनात नसून सुदधा अडकलेले.प्रपंच, जगरहाटी ने त्रस्त असे सगळेच गबाळपंथी आहेत.
असा एखादाच निरक्षीर बुद्धीचा,विवेकी,प्रपंच आणि परमार्थ यांची नेमकी सुवर्णरेश माहीत असलेला धर्मप्रवृत्त माणूस असतो जो या साऱ्यातून तरुन भगवंतप्राप्ती,मोक्षप्राप्ती करून घेऊ शकतो.
समर्थांनी संसारी मनुष्यांचे पूर्ण सत्य सांगताना त्यातले वर्म ही बोट दाखवून वर्णन केले आहे.एकप्रकारचा बेरकीपणा प्रत्येक मनुष्य आपल्या आयुष्यात वापरतो.आणि जेंव्हा हा बेरकीपणा उघडकीला येऊन संसारातील वस्तुस्थिती प्रकट होते तेंव्हा तो परमार्थाची कास धरतो.तोपर्यंत नाही.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment