समर्थांच साहित्यविश्व (अभंग ९)(भाग१)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग ९*

*भाग १*

*अपराधी अपराधी..|*
*आम्हा नाही दृढ बुद्धि.||१||*

*माझे अन्याय अगणित.|*
*कोण करेल गणित..?||२||*

समर्थ म्हणतात...

आम्ही अगणित अशा चुका करतो.मानसिक,सामाजिक,वागणुकीमध्ये.काही आम्हाला कळतात..काही कळत नाहीत.काहिकडे दुर्लक्ष ही होते.

समर्थ म्हणतात...

हे सारे आमच्या मूढपणा मुळे होत.कोणतंही भान आम्हाला राखता येत नाही कारण स्वमग्नते मध्ये मन कायम गुंतलेले असत.अशा ने बुद्धि दृढ रहात नाही.उलट कोती होते.

समर्थ म्हणतात..

या माझ्या मूढ बुद्धीमुळे चुका तर अमाप होतात.या चुका दुसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत चुकीचे ग्रह,एखाद्या प्रसंगाबाबतीत,घटनेबाबतीत त्यातल मर्म न लक्षात येणं यामुळे आमच्या चुका वाढतच चालल्यात.

समर्थ म्हणतात...

या माझ्या दुर्गुणाची परीक्षा करण्यासाठी एक सगुणी व्यक्ती पाहिजे.जी कठोरपणे माझं मूल्यमापन करेल.मला माझ्यातल्या  चुकांच अस्तित्व दाखवून देईल.

समर्थ एका अशा आदर्श व्यक्तीची जीवनात  आवश्यकता आपल्याला सांगतात जो आपली स्वभावशुद्धी,आचरणशुद्धी करून देईल.समर्थ आपल्याला अशी व्यक्ती म्हणून निस्पृह गुरुकडे अंगुलीनिर्देश करत आहेत.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment