समर्त्यांचे साहित्यविश्व (अभंग ९)(भाग २)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग ९*

*भाग २*

*मज सर्वस्वे पाळावे.|*
*प्रतीतीने सांभाळावे.||१||*
*माझी वाईट करणी.*
*रामदास लोटांगणी.||२||*

समर्थ म्हणतात..

रघुराजा...तू मन,शरीर सारे जन्माला घातलेस..!त्यांना निश्चित असे कार्य दिलेस.पंचेंद्रियांना जाणीव दिलीस.ज्ञानेंद्रियांना ज्ञान दिलेस.आता तू या सगळ्यांच ममतेने पालन  कर..!

समर्थ म्हणतात...

हे सगळं आता निश्चित तुझं आहे.तुझ्या संकीर्तनात,तुझ्या पूजनातच  नित्य आहे.आता तूच याचा निश्चित सांभाळ करशील अशी अपेक्षा आहे..!

समर्थ म्हणतात..

तू समवेत असून सुद्धा माझ्या स्वार्थ बुद्धीने मी अनेक वेळा परमार्थात त्रास होईल अशी कामें करतो.चुका करतो.अन्याय करतो.

समर्थ म्हणतात...

या सगळ्याच निराकरण तुझ्या चरणाशीच होईल.हे मी जाणून आहे.म्हणून साष्टांग प्रणिपात करतो. तुझे चरण हेच माझे मुक्तीस्थान आहे.

समर्थ स्वतःची मनमोकळी भूमिका रामरायांचे पुढे मांडतात.जशी भक्ती ही स्वीकार करा असा धावा करतात तसाच झालेल्या ज्ञात,अज्ञात चुकेसाठी क्षमायाचनाही करतात..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment