समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*सीवर्णा मनाचा विपरीतवाणा..|*
*उदास वाटे बहुसाल प्राणा..|*
*मग राघवा रे तुज वाहिलो रे..|*
*कृपाळूवे सत्वर पाहिलो रे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

राघवा..भवभयाने जेंव्हा मी गलितगात्र होतो,मनाची अवस्था ही अतिशय विकल होते.जगणं असार होऊ लागते.

समर्थ रामदास म्हणतात..

राघवा..या विपरीत काळामुळे माझी भावनिक,मानसिक अवस्था अतिशय दोलनामय,करुण होऊन जाते.आणि कुशंकीत होऊन जाते.

समर्थ रामदास म्हणतात..

राघवा..ही अवस्था आल्यावर मी तुझ्यासाठी,तुझ्या प्राप्तीसाठी माझ्या साऱ्या इच्छा,आकांक्षा याचा त्याग केला आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

राघवा,आता फक्त तुझ्या सत्वर समीप बोलावण्याची,तुझ्या कृपेची मी यथावकाश वाट पहातोय. ही कृपा माझ्यावर करशील याची खात्री आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment