*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*
🌺
*चमत्कारले चित्त हे रामगुणी..|*
*उठे कीर्ति वाखाणिता प्रीती दूणी..|*
*रघुनायकासारिखा देव नाही..|*
*क्रिया पाहता चोखडी सर्व काही..||*
🌺
समर्थ रामदास म्हणतात..
रघुराजांच्या कृपेचे अनेक दाखले,कहाण्या,लीला हे ऐकणे म्हणजे चमत्कारापेक्षा कमी नाहीत.कारण कल्पनेच्या पलीकडच सुख हा रघुराज आपल्याला देतो.त्यामुळे अपरंपार सुख मनात साठून येते.
समर्थ रामदास म्हणतात...
प्रत्येकवेळी रामराया नवीन असे कृपेचे सागर माझ्यासमोर खुल करतो.आणि ते अनुभवताना माझ्या मनात त्याच्याबद्दलची भक्ती आणि प्रेम दुणावते आहे.
समर्थ रामदास म्हणतात..
रघुराज हा असा देवराज आहे की जो संयत सहनशक्ती आणि अपूर्व रणशक्ती याचा संयम आहे.याशिवाय वात्सल्य आणि मित्रत्व याचाही एकमेव आदर्श तो एकमेवच आहे.
समर्थ रामदास म्हणतात..
या रामरायाचा प्रत्येक पराक्रम,प्रत्येक लीला, प्रत्येक कार्य हे रोखठोक आणि समर्पक आहे.त्यात कोणतंही वैगुण्य राहिलेल नाही.इतका तो गुणसंपन्न असा देव आहे.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment