समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*रघुपती गुणरंगे पाविजे भक्तीसंगे..|*
*भजन जनतरंगे सर्व सांडून मागे..|*
*अनुदिन वितरागे योगयागं विरागे..|*
*प्रकट तरत संगे सर्वदासानुरागे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

माझा रामराय मला कसा पाहिजे तर तो सर्व गुणाने युक्त,सर्व दृष्टीने पूर्ण,सर्व वृत्तीने विदेह..!आणि हा परिपूर्ण असा हा रामराजाच्या भक्तीरंगात रंगलेला राम निकट असू दे..!

समर्थ रामदास म्हणतात..

तो स्वतः संकीर्तनात स्वतःला हरवून घेतोच पण त्याबरोबर भक्तगणांना ही तो त्यांचे तापत्रयी विसरून,मागे टाकून परमार्थाच्या सुरेख वाटेवर आणून ठेवतो.

समर्थ रामदास म्हणतात..

या संकीर्तनाने,उपासनेने मी आसक्तीविरहित होत चाललो आहे.योग,तपस्या,अनुष्ठानाने मनातील सर्व प्रकारची आसक्ती नष्ट होउन मन विदेही होत चालल आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

या सगळ्या संकीर्तनाच्या सोहळ्यामध्ये हा राम ही रंगून जातो..!आमच्या सारख्या दासांच्या या सोहळ्यात एक दैवत म्हणून तो असतोच पण आमच्यातला भक्त होऊन ही आमच्यात तल्लीन होऊन जातो.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment