*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*
🌺
*रघुनाथदासा कल्याण व्हावे..|*
*अती सौख्य व्हावे आनंदवावे..|*
*उद्वेग नासो वर शत्रू नासो..|*
*नानाविळासे मग तो विळासो..||*
🌺
समर्थ रामदास म्हणतात..
रामराया..माझ्यासारख्या रामदासांचे कल्याण व्हावे.जे कल्याण तुझी भक्ती करत तुझ्यात लिन व्हावे,समर्पित व्हावे..एकरूप व्हावे यात आहे.
समर्थ रामदास म्हणतात..
ही रामकृपा आमच्यासारख्याच सर्वोच्च सुख आहे.इतर कोणत्याही ऐहिक सुखापेक्षा ही कृपा लाभण हे मला सुखासिन जीवनाची आनंदवल्ली वाटते आहे.ती मला मिळू दे.
समर्थ रामदास म्हणतात..
रामराया..तुझ्या या आनंदलहरींनी माझ्या मनातली दुश्चित्तता निरसून जावी.माझ्या मनातले शत्रूरूपी विकल्प आहेत ते नाश होऊ देत.
समर्थ रामदास म्हणतात..
रामराया.. एकदा तू माझ्या मनाला,तनाला माहिती झालास की मग माझ्या प्रत्येक सुखात,प्रत्येक आनंदात तू सुखवल्ली म्हणून विराजमान हो.म्हणजे हे सुख अक्षय होईल.
समर्थ रामाप्रति असलेल्या कृपेची अपेक्षा रामाला सांगतात. आणि त्या सुखाच्या योगाने प्रत्येक क्षणी,प्रत्येक आनंदात रामाला वसायची विनंती ही करतात.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment