*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*
🌺
*अजयो न हो रे जयवंत हो रे.|*
*आपदा नको रे बहु भाग्य हो रे..|*
*श्रीमंतकारी जनहितकारी.|*
*परऊपकारी हरि दास तारी..||*
🌺
समर्थ रामदास म्हणतात..
रामराया..मला षड्रिपुवर विजय मिळवायचा आहे पण तो मिळवल्याचा अभिमान मात्र नको आहे.मला त्या अभिमानावर ही जय मिळवायचा आहे.त्या सर्वप्रकारे मला जयवंत व्हायचं आहे.
समर्थ रामदास म्हणतात..
रामराया..उपासनेत संकट नकोतच.किंव्हा अधीरतेने येणारी आशंका ही नको.पण मला त्यानंतर तुझ्या कृपेचे येणारे भाग्य मात्र अपेक्षित आहे रे..!
समर्थ रामदास म्हणतात..
रामराया..तुझी आम्हाला सर्वप्रकारे मानसिक,शारीरिक संपन्न करणारी वरदमूर्ती अतिशय आवडते.आणि त्यानेच सगळ्यांच खर हीत ही तू साधून देतोस.आयुष्य धन्य करून देतोस.
समर्थ रामदास म्हणतात..
रामराया..असा तू जो प्रत्येकावर कृपेची छाया धरून प्रत्येकाचं आयुष्य कृतार्थ करणारा,तू माझ्या ही आयुष्याच कल्याण करून हा भवसागर तू तरुन न्हेशील याची खात्री आहे.
समर्थ आपल्या मनातली रामकृपेची आकांक्षा इथे व्यक्त करतात आणि ती व्यक्त करताना रामगुणगान करून ते रामदर्शन आपल्यासाठी खुल करतात.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment