*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*
🌺
*सकळ भुवन तारी राम लीळावतारी..|*
*भवभय अपहारी राम कोदंडधारी..|*
*मनन करि मना रे धीर हे वासना रे..|*
*रघुविरभजनाची हे धरी कामना रे..||*
🌺
समर्थ रामदास म्हणतात..
साऱ्या त्रिभुवनाला तारून त्याच कल्याण करणाऱ्या रामाने त्याच हे कार्य पूर्ण करण्यासाठी अनेक अवतार घेतले,ते घेऊन अनेक कृपापर लीळा या रामप्रभुने केल्या आहेत.
समर्थ रामदास म्हणतात..
मनात विकल्प करणाऱ्या भवाच्या लाटा आणि भयाच्या आशंका यांचा परिहार हा राम कृपारूपी कोदंडाने करतो.
समर्थ रामदास म्हणतात..
अशा रामरायाचे चिंतन हेच खरे मनाचे इप्सित आणि कर्तव्य आहे.आपल्या मनाने हे आपलेसे केले पाहिजे.त्यामुळे मनात धीर पणे वासनांचा उदय होण्याआधी त्यांचं निरसन होईल.
समर्थ रामदास म्हणतात..
या सगळ्यातून आयुष्य कृतार्थ होण्यासाठी रघुनाथाची उपासना हा एकच छंद असला पाहिजे जो जीवनाचा अंतिम ध्यास असला पाहिजे.म्हणून हे मना तू रामोपासनेच लक्ष्य समोर ठेव.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment