समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*लीळाविग्रही देव ब्रह्मदिकांचा.|*
*सदा बोलणे चालणे सत्य वाचा..|*
*जया चिंतिता चंद्रमौळी निवाला..|*
*प्रभू देखिला दास संतुष्ट झाला..||*

समर्थ रामदास म्हणतात..

रामप्रभु ही देवता स्वतःच्या सत्वगुणी लीळेमुळे पूर्ण देवाधिकांचे आराध्य बनली आहे.रामरायांचे सत्वच इतके तेजल आहे की त्याची उपासना ब्रह्मदिक देवतांनी केली आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

या रामरायाचे बोल मधुर तर  आहेच पण याशिवाय त्याचे  अस्तित्व सत्वगुणी असल्यामुळे,आणि त्याचे वचन ही अतिशय बहुश्रुत आणि समाजकल्याणीच असते.

समर्थ रामदास म्हणतात..

शिवशंकराने प्राशलेले हलाहल ज्याच्या केवळ नामोच्चरणाने शीतल झाले असा हा रामचंद्र शीतलतेचे प्रतीक आणि उगम ही आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

असा हा रामराय दर्शनाचे कृतार्थ असे फळ देतो ज्याने रामदास,भक्त संतुष्ट होतात..!आणि ते जन्माचे सार्थक करतात.

समर्थ रामदर्शनाचे फळ समजावून सांगतात.आणि त्या रामदर्शनाने त्यांना मिळालेल्या सकृत आणि अंतिम समाधानाचे ही वर्णन करतात.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थ रामदास रचित गणपतीस्रोत्र-७

*समर्थ रामदास रचित मनोहर गणेशस्तुती-७*

🌹🌺
*नटवर नटनाट्ये नाट्यनटवांगसंगी..|*
*गजवदन सुरंगी रंगसाहित्यरंगी.|*
*अभिनव नटलीळा रंगणी रंग माजे..|*
*चपळपण विराजे सर्व कल्लोळ गाजे..||*
🌹🌺

समर्थ रामदास म्हणतात..

हा गणेश रंग भरू लागला की श्रीकृष्णासारखा सर्वव्यापी नटवर होतो.ह्याच्या प्रत्येक लीळातून एक कथा,एक सुरस नाट्य निर्माण होते.किंबहुना त्याच्या लयबद्ध पद्न्यासाने त्याचे दर्शन हे एका अविरत मयसभेसारखेच भासत.

समर्थ रामदास म्हणतात..

हा गणराज गजवदनी आहे.त्यामुळे त्याच विघ्ननाशक दर्शन हे एका गूढ अशा भाववृत्तीच तसेच अतिशय वैविध्यपूर्ण अशा गुणप्रभावाच द्योतक आहे अस जाणवत.

समर्थ रामदास म्हणतात..

या गणेशाच्या अनंत आणि नवनवीन लिलांनी एक अपूर्व,अकल्पित आणि अविरत अशी सुख, समाधानी अशा प्रसंगाची शृंखला आपल्या आयुष्याच्या रंगमंचावर घडते किंव्हा तो ती घडवतो.

समर्थ रामदास म्हणतात..

या गजाननाच्या लयबद्ध हालचाली इतक्या सुयोग्य आणि नेमक्या असतात की त्या सर्व नटराज स्वरूपातील सुखतांडवाने सुखाच्या कल्लोळाने विश्व आणि त्यामुळे आपले मन हे उल्हसित होऊन जाते.

समर्थ या ओवीमध्ये गणपतीच्या नटराज रुपात वर्णन करतात. त्याच हे सुख नर्तन भक्तांच्या आयुष्यात सुखाचा पदन्यास करत याच प्रकटीकरण समर्थ या ओवीत करून देतात.

जय गजानन..!
जय श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थ रामदास रचित गणपतीस्त्रोत्र-६

*समर्थ रामदास रचित मनोहर गणेशस्तुती-६*

🌹🌺
*गजवदन विराजे रंगसाहित्य माजे..|*
*रतिपतीगती लाजे लुब्ध कैळासराजे..|*
*फरश कमळ साजे तोडरी ब्रीद गाजे..|*
*सिद्धी बुद्धि अबळा जेपावती विश्वबीजे..||*
🌹🌺

समर्थ रामदास म्हणतात..

गणराज हा प्रसन्नमुखी,गजवदनी इतका विशाल आणि प्रफुल्ल दिसतो की त्याच्या अस्तित्वाने सभोवतीच्या वातावरणात एकप्रकारचा सुखाचा उन्माद असतो.

समर्थ रामदास म्हणतात..

हा उन्माद इतका लुब्ध आणि आनंददायक असतो की रति-कामदेवाचा शृंगारगंध ही इथे कमी वाटतो.आणि त्या आनंदसंगात कैलासाधीपती गुंग होऊन जातो.

समर्थ रामदास म्हणतात..

या गजवदनी चेहऱ्याभोवती हाती धरलेले परशु,कमळ त्या मुखकमलाची शोभा वाढवतातच पण त्याबरोबर हातातले तोडर हे त्या दर्शनाचा आनंद द्विगुणित करतात.

समर्थ रामदास म्हणतात..

हा गजानन सिद्धी आणि बुद्धीच्या संगतीने एक पूर्ण असे विश्वोद्धार करणारा असा स्फुल्लिंग असा जाणवतो.ज्यापासून सकळ विश्वउत्पत्ती होते आणि जिथे विश्व लय ही पावते.

समर्थ गणपतीचे संकुटुंब वैश्विक रूप इथे प्रकट करतात.आणि त्याच दर्शन हे किती सुमोहक आहे याचं वर्णन ही या ओवीत करतात.

जय गजानन..!
जय श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थ रामदास रचित गणपतीस्रोत्र-५

*समर्थ रामदास रचित मनोहर गणेशस्तुती-५*

🌹🌺
*ध्यानी धरील नरकुंजर बुद्धिदाता..|*
*त्याची फिटे आवलीळा सकल चिंता..|*
*आधी गणेश सकळा पुजणेचि लागे..|*
*दासा मनी तजविजा आवजा न लागे..||*

समर्थ रामदास म्हणतात..

या गजाननाचे पद्मासन स्थितीतील ध्यान(नरकुंजरी अवस्था) खूपच मनभावन आहे..!तसच ध्यान जो धरेल त्याची साधना ही यथावकाश फलद्रुप होते.

समर्थ रामदास म्हणतात..

असे नरकुंजरी ध्यान मनात  धरल्याने आयुष्यात उठलेले समस्त विकल्प,सगळ्या चिंता,सगळी संकटे निवारण होऊन तो भक्त सुखी होतो.

समर्थ रामदास म्हणतात..

या गजाननाचे पूजन,ध्यान सर्व भक्त,तापसी,साधू,संत यांनी करणे हे इष्ठच असते.हे सर्वप्रथम करण्याने त्यांचं इच्छित कार्य अतिशय  सुलभतेने पूर्ण होते.

समर्थ रामदास म्हणतात..

हे गजाननाचे नरकुंजरी  चिंतन प्रत्येक भक्ताला चिंता आणि भय यापासून मुक्त करते.आणि ह्या साऱ्या भावनांपासून त्याचे अस्तित्व कायमच अबाधित रहाते..!

समर्थ रामदास गणपतीचे नरकुंजरी रूप इथे प्रकट करतात.हे गणेशाचे ध्यान दुर्लभ पण मुक्तीदाते  आहे.आणि त्याच्या उपासनेच फलित इथं सांगतात.

जय गजानन..!
जय श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थ रामदास रचित गणपतीस्त्रोत्र -४

*समर्थ रामदास रचित मनोहर गणेशस्तुती-४*

🌹🌺
*वीतंडसा बलदंड गिरीतुल्य धावे..!*
*भक्तांसि रक्षित रिपूवरी तो उठावे..|*
*अंदुस तोडरगुणे करितो चपेटा..|*
*गर्जीन्नल्या घणघणाट प्रचंड घंटा..||*
🌹🌺

समर्थ रामदास म्हणतात..

अत्यंत विशाल रूप घेऊन  हा गजानन पूर्ण ताकदीने पर्वतप्राय असा विश्वरूप अवतार घेऊन प्रकट होतो,धावून येतो..!

समर्थ रामदास म्हणतात..

असा गजानन विराट रुपात भक्तांच्या रक्षणासाठी नेहमी सचेत असतो.त्याच हे भीमरूप हे विघ्नावर  कर्दनकाळ बनून एक प्रहार होऊन त्यातून भक्त आणि सज्जनांच रक्षण करणार ठरत..!

समर्थ रामदास म्हणतात..

गजाननाचा हा आघात अतिशय न्यायप्रिय असतो.तो भक्ताला कळू न देता त्याच संरक्षण करतो.आणि त्याच्या विषम परिस्थितीवर नियंत्रण आणून भक्ताला सुखी करतो.

समर्थ रामदास म्हणतात...

या गजाननाच येणं हे इतकं प्रचंड अशा ध्वनांकीत अस्तित्वात येत की सहस्त्रावधी घंटानाद चालू आहे अस जाणवत.ह्या उदंड ध्वनीनेच विघ्न पळून जातात.

समर्थ गणपतीचे विराट,भव्य अस विश्वरूप इथं वर्णन करून सांगतात.भक्तांच्या विघ्नहरणासाठी त्याची भक्तवत्सल तत्परता किती भेदक आहे हे त्यांनी या ओवीत समजावून सांगितलं आहे.

जय गजानन..!
जय श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थ रामदास रचित गणपतीस्त्रोत्र-३

*समर्थ रामदास रचित मनोहर गणेशस्तुती-३*

🌹🌺
*फर्सा पुसुनि सरसावतसे अघाला..|*
*भक्तांसि विघ्न रचितां रिचवीत घाला..|*
*साठीसहस्त्र गण त्यांसरीसा निघाला..|*
*मूषकवाहन करी दुरितासि हाला..||*
🌹🌺

समर्थ रामदास म्हणतात..

परशु हाती बाळगलेला गणराज जेंव्हा तो परजून एखाद्या विघ्नावर चाल करून जातो तो जाणारा गणराज रणवीर स्वरूपातला रुद्र भासतो.

समर्थ रामदास म्हणतात..

भक्तांच्या पुढ्यात जेंव्हा एखादे विघ्न निर्माण होत..रचल जात..!तेंव्हा त्या विघ्नाचा त्याचक्षणी नायनाट करण्याचं कसब या गणराजाकडे आहे.त्याचा आवेग हा त्या विघ्नाकर्त्याला कधीच सहन होत नाही.

समर्थ रामदास म्हणतात..

साठ हजार या गणराजाचे गण आहेत.हे गण म्हणजे त्याच सामर्थ्य आहेत..!या सगळ्या सामर्थ्यवान चालीसह हा गणराज अतिशय वैभवशाली स्वरूपात विघ्नकर्त्यावर चाल करून जातो.

समर्थ रामदास म्हणतात...

हा मूषकवाहन असलेला गणराज जेंव्हा एखाद्या विघ्नावर,दुराचाऱ्या वर चाल करून जातो तेंव्हा त्या विघ्नाला,दुरीताला त्राही माम करायची वेळ येते.

समर्थ या गणराजाचे सामर्थ्य या ओवीत समजावून सांगतात.त्याच रणसामर्थ्य,त्याच अस्त्र सामर्थ्य,त्याच वहन करण्याऱ्या मूषकाची वेगशक्ती..!या साऱ्याच मूर्त वर्णन समर्थ या ओवीमध्ये करतात.

जय गजानन..!
जय श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थ रामदास रचित गणपती स्त्रोत्र-२

*समर्थ रामदास रचित मनोहर गणेशस्तुती-२*

🌹🌺
*गंडस्थळे झिरपती बहु वास जेथे..|*
*सुवासमस्त रिझले अळीकुळ तेथे..|*
*शुंडा प्रचंड मिरवी गजकर्णथापा..|*
*तेजाळ अंकुश म्हणे दुरितासि कापा..||*
🌹🌺

समर्थ रामदास म्हणतात...

गणराजाच्या या विशाल रूपाने थक्क होऊन पहात असताना जाणवते की त्याच्या गंडस्थळातून वीरश्री,पौरुषी मद झिरपतो जो त्याच्या भाळावर कायम विराजत असतो.

समर्थ रामदास म्हणतात..

त्या मदा ने उन्मत्त झालेली गणराजाची भृकुटी आणि एकूणच भाळप्रदेश त्याच्या अलिप्त सुवासाने अधिकच उत्तेजित अशी वीरश्री, पौरुषेय वीरश्री प्रदर्शित करते आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

अतिशय चपळ अशा सोंडेने हा गणराज जेंव्हा आनंद प्रदर्शन करत असतो तेंव्हा भल्या मोठ्या कर्णयुगुलांच  लयबद्ध फडकावण ही प्रचंड अशी अभेद्य मोदतांडवाची सुरुवात असते.

समर्थ रामदास म्हणतात...

ह्या सगळ्या आनंदतांडवा मध्ये तळपणारा अंकुश सदा तल्लख असतो.या साऱ्या आनंदतांडवामध्ये विघ्न आणणाऱ्या असुर प्रवृत्तीचा नायनाट करण्याचं सामर्थ्य सदा हा गणपती बाळगून आहे.

समर्थांना प्रत्येक देवतेमध्ये असणारे अपूर्व असे भक्तवत्सल रूप भावते तसे त्या त्या देवतांच्या अंगभूत असणारी वीरश्री ही समर्थाना अतिशय प्रिय आहे.ह्या ओवीत समर्थ विरगणपती स्वरूपात विशाल असलेल्या गजाननाचे वर्णन करत आहेत.

जय गजानन..!
जय श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थ रामदास स्वामी रचित गणपतीस्त्रोत्र-१

*समर्थ रामदास रचित मनोहर गणेशस्तुती-१*


🌹🌺
*विद्यानिधान गणराज विराजताहे..|*
*सिंधुर तो घवघवीत रसाळपाहे..|*
*विघ्नांसी मार अनिवारचि होत आहे..|*
*आनंदरूप तुळणा दुसरी न साहे..||*
🌹🌺

समर्थ रामदास म्हणतात..

माझ्यासमोर जो विराजमान झालेला प्रफुल्ल देव आहे तो गजानन जो सकल विद्यांची एक अनंत साठवण आहे.तो गणपती असा एकमेव अधिपती आहे जो प्रतिष्ठित झाला की भोवती श्रद्धा,विद्या,सुमती,ज्ञान ह्या सगळ्यांच वास्तव्य आधिष्ठान पावत.

समर्थ रामदास म्हणतात..

हा विद्याप्रधान गजानन... त्याच स्वरूप, सगुणरूप,मूर्तरूप हे लाल शेंदुराने लिप्त असे आहे.ह्या  शेंदूरअर्चित गणेशाचे दर्शन हे तेजोमय रक्तरंगी जाणीवरूप आहे..!

समर्थ रामदास म्हणतात..

हा गणेश विघ्नहर्ता म्हणून प्रख्यात आहे.त्याच अस्तित्व,त्याच दर्शन,त्याच देवत्व इतकं प्रखर आहे की सर्व विघ्नरुपी दानवांच निर्दालन हा गणेश लीलया करतो.आणि त्याचा विघ्नावरती झालेला वार त्या संकटांना अनिवार,सहन न होईल असा असतो आणि भक्तांना आशिर्वादपूर्ण असतो.

समर्थ रामदास म्हणतात..

ह्या गणरायाचं स्वरूप हे उल्हासयुक्त आहे.प्रेरक आहे.हे मुखदर्शन सुखाची प्राप्ती आहे.ह्यातून प्रतीत होणार चैतन्य इतकं मोदप्रद आहे की त्याच धाम, त्याच सगुण रूप विराजित असलेलं स्थान सोडून कुठेही मन रमत नाही.आणि त्यासारखं इतकं सुखनंदन देवअस्तित्व दुसरं कुठे मिळत ही नाही..!

समर्थ रामदास गणपतीची  करुणास्रोत्ररुपी पूजा करताना सुंदर,रसाळ वर्णन करतात.समर्थांच्या शब्दांनी प्रत्यक्ष ते सुंदर ध्यान आपल्यासमोर उभं रहात.आणि आपण त्याच दर्शन आपल्या स्वतःत साठवून ही घेऊ लागतो..!

जय गजानन..!
जय श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*नव्हे राजयोगी महद्भाग्य त्यागी..|*
*उदासीन जो वीतरागी विरागी..|*
*जनस्थानगोदातटी वास केला..|*
*प्रभू देखिला दास संतुष्ट जाला..||*

समर्थ म्हणतात...

श्रीरामाच एक वेगळं स्वरूप.त्याच राजेश्री दर्शन,त्याचा एक भरजरी अवतार सोडून इथे तो त्यागी बनून राहिलाय.इथे तो वनवासी जीवन जगतोय.भाग्याला आलेलं वैभव मागे ठेवून हा रामराजा इथे उभा आहे..!

समर्थ म्हणतात...

रामराय..इथे जो आहे.तो रागलोभ मागे सोडून,राजयोग बाजूला ठेवून..!एक प्रकारचं प्रापंचिक वैराग्य लेवून हा राम एका तापस वेषात इथे उभा आहे..!

समर्थ म्हणतात...

हे स्थान पंचवटी.जे गोदावरीच्या निर्मळ तटावर वसलेलं आहे.जिथं रामप्रभु सपत्नीक वास करत आहेत.लक्ष्मणाच्या संगतीत.पंचवटीची भूमी या पदस्पर्शाने पावन झाली आहे.

समर्थ म्हणतात...

असा वैराग्यपूर्ण राम या डोळ्यासमोर उभा आहे.मी त्याच दर्शन घेऊन,दास्यभक्ती करून  तृप्त आहे.तो रामराय जो माझ्या जपात,चिंतनात आहे तो साक्षात माझ्यासमोर सगुणरुपात उभा आहे.

समर्थ पंचवटी इथे गेल्यावर रामप्रभूंच्या समोर उभे राहिल्यावर त्याच वर्णन करतात.तो राम त्यांना कसा दिसला याचही वर्णन करून आपल्याला आलेला अनन्य अनुभव इथे कथन करतात..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*विधिकुळभूषणाचे धाम सर्वागुणांचे..|*
*भरण अभरणाचे सर्वलावण्य साचे..|*
*सुख परमसुखाचे ध्येय ब्रह्मदिकांचे..|*
*भजन हरीजनाचे गुज हे सज्जनांचे..||*

समर्थ म्हणतात..

आचार,विचारांनी युक्त असे ज्याचे कुळ आहे.अशा समस्त कुळाला ही जो राम भूषणावह आहे.असा राम जो सर्वगुणांचा एक समुच्चय आहे.एक ठिकाण आहे जिथे या सर्व उत्तम गुणांचा सहज वावर असतो.

समर्थ म्हणतात..

ज्या रामरायांच्या शरीरावर जन्मतःच तेज आहे.देवत्व आहे.याशिवाय त्याच हे मुग्ध पुरुषी शौष्ठव अनेक अशा आभूषणाने अजूनच तेजाळून उठलं आहे.त्याच मनोहारी दर्शन अजूनच सुखदायी होत चालल आहे.

समर्थ म्हणतात..

हे सुख जे रामाचे अस्तित्व आहे..!किंव्हा ज्या अस्तित्वात रामाच वास्तव्य आहे ह्याचा चिरंतन शोध अनेक तापसी संत,महंत, मुनिश्रेष्ठ च नाही तर अनेक देव ही त्या रामाच्या  आश्रयाची,कृपेची,त्याच्या ठायी असलेल्या उत्तम सुखप्रवृत्तीची आस धरून आहेत.

समर्थ म्हणतात..

ह्या सगळ्याची आस, ध्येय असलेले जे सज्जन मनुष्य आहेत त्यांना हे सगळं प्राप्त होण्यासाठी एकच सोपा साधा मार्ग आहे तो म्हणजे हरिकीर्तन,रामसंकीर्तन..!ज्यायोगे हे सगळं रामसुख सज्जनलोक प्राप्त करून घेतात.घेऊ शकतात.

समर्थ सज्जनांच्या सज्जन मतीच गुज इथे वर्णन करतात.ते ज्याच्यामुळे त्यांच्या मनात तेवत असत त्या रामसंकीर्तनाची महती आणि रामअस्तित्व इथे वर्णन करून सांगतात.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*हरीजनभजनाचा होय साक्षी मनाचा..|*
*सकलत्रिभुवनाचा प्राण साधुजनांचा.|*
*परि हरिभजनाचा आखिलासे दिनाचा.|*
*घननिळ गगनाचा रंग सर्वोत्तमाचा..||*

समर्थ म्हणतात...

हा रामराया त्याच्या संकीर्तनाच्या ठिकाणी असतो.जिथे रामनाम तिथे राम.तो आपण करत असलेल्या प्रत्येक कृती,हालचालींचा एकमेव साक्षीदार ही आहे.की ज्याच्या आधारे ते कार्य सत्वगुणी करायला हुरूप येतो.

समर्थ म्हणतात..

हा राम,त्याचा सत्वगुण तिन्ही लोकात जो चांगुलपणा आहे त्यात रममाण आहे.आणि हा सत्वगुण अनेक साधू,सज्जन,संतांच जगण्याच साध्य आहे.अर्थात राम या साऱ्याच्या आयुष्यातील जिवंतपण आहे.

समर्थ म्हणतात...

तो रामराय हरिभजनी असलेल्या दासांचा अखिल असा सर्वसंगी आहे.तो त्यांच्या मनात कायम विराजित असा देववास आहे.त्या सत्वगुणी मनुष्यातील उर्वरित दैन्याचा परिहार आहे.

समर्थ म्हणतात..

निळ रंग हा मनाला आराम देणारा..तृप्त करणारा.जो रंग आकाश मुळरूपात पांघरते.असा रंग रामरायांच्या तनु चा ही आहे.त्यामुळे आकाशासरखी छाया म्हणजे सर्वोत्तम असा रामराय..!

समर्थ सत्वगुणी राम आणि  सत्वगुणी मनुष्यातील सत्य,सुंदरतेचा आविष्कार वर्णन करून सांगतात.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*स्मरण स्मररिपूचे विषहर्ते वपूचे.|*
*निजविज निगमाचे सार सर्वागमांचे.|*
*मन त्रिभुवनाचे गुज योगीजनाचे..|*
*जिवन जड जीवांचे नाम या राघवाचे..||*

समर्थ म्हणतात...

षड्रिपूच्या संगाने मनात,शरीरात जो विषरूपी संसर्ग होतो.मन कलुषित होते.शरीर हे वासनासंगाने कुष्ठ होते.अतृप्तीमुळे डहूळले जाते.हे सारे रामवृत्ती आणि रामनामाने सज्जनसंगी होते.शुद्ध होते.

समर्थ म्हणतात..

हे रामरायांचे स्वरूप,दर्शन हे पुराणकथाचे फळ आणि वेद,वेदांगाचे स्वरूप आहे.आणि हेच स्वरूप कुठल्याही सज्जनमनात ही असते.कारण ते शुद्ध आहे.सत्व आहे.

समर्थ म्हणतात..

तिन्ही लोकांचा चांगुलपणा असलेलं हे मन ल्यायलेले हे मनुष्य अनेक संत,महंत, तापसी यांच्या वचना प्रमाणे आयुष्य काढत असतात.स्वतःही तृप्त,आनंदी असतात..आणि सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला ही तसच करतात..!

समर्थ म्हणतात..

अशा मनुष्याचे सर्व कर्तव्य आणि गुण लाभलेले आणि जगत असलेल्या प्रत्येकाचे स्थिर असे ठिकाण,लिन होण्याचे ठिकाण, विश्रांतीस्थळ हे फक्त रामनाम आहे.आणि ते जपून आयुष्य सफल करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.

समर्थ रामराया आणि समाजातील सत्वगुणी माणसे याची सांगड घालून त्यांच्यातला राम आपल्यापुढे उलगडून सांगतात.त्याची लक्षणे आणि सुखांकीत अस्तित्व आपल्यापुढे प्रदर्शित करतात.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्तोत्रे*

🌺
*दशशतवदनाचा धीर मेरू बळाचा..|*
*परम कुशळ वाचा शेष सर्वोत्तमाचा..|*
*अगणितगुणमुद्रा शोधिता त्या नरेंद्रा.|*
*अकळ विकळभावे जाहला गुणनिद्रा..||*

समर्थ म्हणतात..

रामरायाच मूळ स्वरूप हे दहासहस्त्र मुखांच्या समाजपुरुषा सारख आहे.तो समाजपुरुष स्वत्वगुणी आणि धीरोदात्त प्रवृत्तीचा आहे जसा राम आहे.हा सामंजस्य आणि सत्यप्रिय अशा गुणांचा एक पर्वतप्राय आदर्श आहे.

समर्थ म्हणतात..

सर्वांना प्राणप्रिय असा हा नरोत्तम आहे.अतिशय कोमल वचनी तर आहेच.पण तो सगळ्या सद्गुणांचा श्लेष आहे..सार आहे.आणि त्यामुळे सगळ्या चराचराचा शेषावतारासम आधार ही आहे.

समर्थ म्हणतात...

सहस्त्रमुखी या रामचंद्राच्या अस्तित्वात अगणित गुणांचा संचार असतो.या सगळ्या त्याच्या मुद्रातून,भावातून त्याच दर्शन हे सर्वोत्तम अशा पुरुषाचच होत.

समर्थ म्हणतात...

हा सर्वोत्तम असा रामराजा माझ्या प्रत्येक आयुष्याच्या अवस्थेत गुण अस्तित्व होऊन गेलेला आहे.त्याचे गुण माझ्या आयुष्याचे इप्सित,साध्य झालेले आहेत.

समर्थ रामरायांचे  समाजपुरुषाच्या रुपात वर्णन करतात.त्या समाजपुरुषाच अस्तित्व स्वतःच्या अस्तित्वातून निर्माण होते याची समाजाभिमुख जाणीव ही आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२