समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*विषम गति मनाची ते मला आवरेना..|*
*शरीर विकळ कामे ते कदा सावरेना..|*
*सुख दुःख मज माझे वाढिले तेची जेऊ..|*
*रघुपती.!तुजला रे कासया बोल ठेऊ..?||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

मनाने खर म्हणजे जन्म मरणाच्या मुक्ततेते कडे जावे.आपले स्वहित करावे.मनुष्यजन्माचे सार्थक साधून देवचरणी कायमचे गढून जावे.

समर्थ रामदास म्हणतात..

शरीर ऐहिक भावनांच्या अतिरेकाने,त्याच्या विचाराने अतिशय गलितगात्र झालं आहे की जे सावरायचा प्रयत्न केला तरी सावरता येत नाहीये.

समर्थ रामदास म्हणतात..

माझ्या कर्म गतीने मला सुखदुःखाने युक्त असे आयुष्य दिले आहे.ते जगणे,ते व्यतीत करणे हे माझे कर्तव्य आहे.त्याचे फलित आनंद असो किंव्हा विषाद असो.

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया,हे सगळं माझं संचित आहे.माझी कर्मरेखा आहे.माझ्या पूर्वजन्मीचा आणि आजच्या चालू जन्माच्या कर्मानुसार भोग मी स्वतः ओढून घेतले आहेत.त्याबद्दल तुला मी कधीच दोष देत नाहीये..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*शमशम विषयांची काही केल्या शमेना..|*
*अचपळ मन माझे साजणी हे दमेना..|*
*अनुदिन मज पोटी दुःख तेही वमेना..|*
*तुजविण जगदीशा वेळ तोही गमेना..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

विषयांची प्रदीर्घ वखवख ही आयुष्याला पुरून उरत चालली आहे.त्या विषयांचा  अंत हा दृष्टिला कुठेही दिसत नाहीये.

समर्थ रामदास म्हणतात..

या विषयांच्या कर्दमात मन अडकून राहू लागल आहे.आणि ते इतक्या वेळा गुंतून ही त्यातून अलग होत नाहीये.

समर्थ रामदास म्हणतात..

या सगळ्याची परिणीती मन अतिशय मनात वैषम्याची स्थिती निर्माण होत असली तरी त्याचे निरसन मी करू शकत नाहीये.ते दुःख त्याग करू शकत नाहीये.

समर्थ रामदास म्हणतात..

हे सगळं आहे पण तुझ्या अस्तित्वाशिवाय मला कोठेही मन रमवता येत नाहीये.त्यामुळे परम सुखाची परमार्थाची प्राप्ती ही होत नाहीये.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*हरि हरि दुरिते तो स्वामी वैकुंठराजा..|*
*सुरवर नर पाळी शोभती चारी भुजा..|*
*झळफळीत किळा हे हेमरत्नांबराचा..|*
*परम कुशळ शोभे नाथ लोकत्रयाचा..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

तो हरि नाव धारण करणारा,दुरितांचे दूरत्व हरण करणारा हा वैकुंठाच्या सिंहासनावर आरूढ झालेला महाविष्णू केवळ अगाध स्वरूपी आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

इंद्रादी देवतांनाही जो पूज्य असा तो चतुर्भुजधारी  महाविष्णू अतिशय मनोहर असा दर्शन देणारा देवाधिदेव आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

या महाविष्णूच्या वास्तव्याच ठिकाण हे सोन्याच्या महिरपी,रत्नांची जडवणूक आणि रजताच्या आकाशाचा आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

हा अतिशय प्रेमळ आणि सकलकल्याणकारी असा देव तिन्ही लोकांचा त्राता होऊन इथे आधिष्ठीत होऊन राहिला आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*विगळीत मन माझे तू करी देवराया..|*
*हरिभजन कराया पाहिजे दृढ काया..|*
*निरूपण विवराया तर्कपंथेचि जाया..|*
*रघुपतिगुणछाया चित्त माझे निवाया..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

रामराया, तू माझे मन इतके निरिच्छ कर की ते त्रिगुणविरहित,वासनाहीन होऊन कल्पनाऔदासिन्याने भरून जाऊ दे.ते एक निश्चल असे बेट होऊ दे.

समर्थ रामदास म्हणतात..

हरिसंकीर्तन करायचे असेल तर मन आधी देवाचे झाले पाहिजे.त्यासाठी दृढतेने फक्त भक्तीची कास आणि आस अतिशय आग्रहाने माझ्या शरीराने,मनाने आपलीशी केली पाहिजे.

समर्थ रामदास म्हणतात..

देवलीला असलेल्या आगम-निगम कथा समजून घ्यायच्या तर निरुपणाचा वाचिक आणि श्रवणीक ध्यास हा असला पाहिजे.आणि त्याची तर्कसंगत मांडणी आणि विवेचन मनातल्या मनात करता आलं पाहिजे.आणि समाजामध्ये प्रभावी पद्धतीने मांडता आल पाहिजे.

समर्थ रामदास म्हणतात..

हे सगळे झाले की रामरायाच्या अनेक लिलायुक्त कहाण्या आणि त्यातून प्रतीत होणारे त्याचे गुणवैभव पाहून,ऐकून माझं मन एक शांत असा नदीचा प्रवाह होऊन जातो.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*विषयविष वमावे कल्पनेला दमावे..|*
*निजपद निजभावें दृढ चित्तीं धरावे..|*
*भवभय निरसावे साधुसंगी वसावे..|*
*सगुणभजन द्यावे स्वामी देवाधिदेवें..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

परमार्थाच्या दृष्टीने,सकल कल्याणाच्या दृष्टीने बाधक असा जो विषयसुख नावाचा एक हलहलाचा घोट आहे जो माझ्याकडुन घेतला जातो त्याचा माझ्याकडून शारीरिक,मानसिक त्याग होऊ दे..!अशा क्षणिक सुखांची कल्पना,वासना याचे चिंतन करण्याचा वीट मला येऊ दे..!

समर्थ रामदास म्हणतात..

एक असे अढळ निश्चिन्त जन्ममरणाच्या फेऱ्याला चुकवणारे मानसिक स्थान मिळवण्याचा कायमचा ध्यास या रामकृपेने मला मिळेल अशी कायम श्रद्धा मनात ठेवून तेच ध्येय असू द्यावे.

समर्थ रामदास म्हणतात..

भवभय नावाचे जे दुःख  उत्पन्न करणारे मनाचे खेळ आहेत ते सज्जनसंगत,साधूसंगत, गुरुसंगत या उपायांनी कायमचे आयुष्याच्या पल्याड सोडून केवळ रामभक्ती, संकीर्तन यासाठी या महानुभावांच्या संगतीत काळ व्यतीत करावा.

समर्थ रामदास म्हणतात..

हे सर्व साधण्यासाठी हे रामराया मला सगुणभजन,संकीर्तन आणि भक्ती करण्याचा वसा मला आशिर्वाद रूपाने मला दे कारण तूच माझा कर्ता,पालनकर्ता असा स्वामी आहेस.कारण तू आम्हा सकलांचा देवाधिदेव आहेस.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*वणवण ही विषयांची सर्वथाही शमेना..|*
*अनुदिन मोहमाया लागली हे तुटेना..|*
*झडकरी मज रामा सोडवी पूर्णकामा..|*
*तुजवीण गुणधामा कोण रक्षील आम्हा..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

आयुष्यातले तापत्रय वाढवणारी ही विषयलोलुप वणवण..त्याची न संपणारी अतृप्त वखवख,रुक्ष भूक ही शांत होत नाहीये.

समर्थ रामदास म्हणतात..

प्रत्येक दिवशी नवीन मोह,नवीन वासना,नवीन मायेचे रूप..त्यातून जन्म घेणारे ऐहिक जन्ममरण याची साखळी तुटत नाहीये.

समर्थ रामदास म्हणतात..

आता मात्र रामराया तू सत्वर तुझी कृपा कर..तू ये आणि मला या वासना बंधनातून कायमचा मोकळा कर.मला तुझ्या पूर्ण अशा व्यक्तित्वात पूर्ण सामावून घे.

समर्थ रामदास म्हणतात..

आम्हाला मानसिक,शारीरिक त्राता तूच आहेस.तूच आमचा तारक आणि भवसागरातला वाहक आहेस.तुझ्याशिवाय कोणी हे करू शकेल असा समर्थ तरी कोण आहे..?

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*ममवदनसरोजी षटपदे शारदांबे..|*
*रघुपतिगुण रुंझे तू न गुंते विलंबे..|*
*तववरि करि लाहो प्राण जै अर्क आहे..|*
*प्रचळीत समयी आकर्षणे स्थिर राहे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात...

माझ्या मुखकमलावर एखाद्या मधाच्या थेंबासारख्या असणाऱ्या रामनामाचा सरस्वतीमाते,तुझ्यामुळे माझ्या वाणीमध्ये  भुंग्यासारखा वावर आहे..!

समर्थ रामदास म्हणतात..

हे सरस्वतीमाते,माझ्या मुखात तू रामाच्या अपरंपार गुणांच्या संकीर्तनाच अखंड गुंजारव करुन दे.त्यासाठी मात्र तू शीघ्र कृपा कर इतर कुठेही गुंतू नकोस.

समर्थ रामदास म्हणतात..

हे सरस्वतीमाते,हे रामनामाच गुंजारव म्हणजे श्वासातील सोहमतत्वाच अस्तित्व हे जोपर्यँत या प्राणात,शरीरात  आत्माराम,पंचप्राणरुपात  आहे तोपर्यंत अबाधित असू दे..!

समर्थ रामदास म्हणतात..

हे रामनाम सध्या आणि कायमच कोणत्याही विषमकाळी माझ्या आयुष्यात,मनात चालू राहू दे.त्याबद्दलच मला असणार प्रेमाचं आकर्षण ते ही कायम जागत असू दे..!ही कृपा कर सरस्वतीमाते..!!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*वरुण वदन वापीमाजि जिंव्हास्वरूपी..|*
*मुख वसत तदापी वैखरी कोकीळापी..|*
*मधुर मधुर कुंजे नाम या राघवाचे..|*
*निववी वसत संती श्रोत्रयां सज्जनांचे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

माझ्या जिभेच स्वरूप एखाद्या संतत धार असलेल्या पावसाच्या सरीसारखं सारख झालं आहे.तिच्यायोगी ही रामनामरूपी संतत धार एका पवित्र डोहासारखी माझ्यात साठू लागली आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

हे नाम माझ्या मुखातून येत खर पण ते इतकं माझं मलाच मधुर वाटत की एखाद्या कोकीळेने अतिशय सुस्वराने आलाप घ्यावा.आणि त्या बंदीशीची लयलूट या साऱ्या आसमंताने करावी.

समर्थ रामदास म्हणतात..

माझ्यात आणि माझ्याभोवती हे रामनाम निसर्गातून,अंतर्मनातून सदोदित इतकं ध्वनित होत त्यामुळे माझा देह,मन एक रामनामाचा गाभारा होऊन जाते.

समर्थ रामदास म्हणतात..

हे रामनाम प्रत्येकाचे मन,हृदय,शरीर निशांत करत जाते.जो कोणी संत या रामनामाचे संकीर्तन करतो,जो कोणी श्रोतृवृंद त्याचे श्रवण करतो,जो सज्जन या रामनामाचे मनन करतो हे सारे या नामसंकीर्तनाने स्वतः कृतार्थ होऊन जातात. मुक्त होऊन जातात.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*सकळ भुवन तारी राम लीळावतारी..|*
*भवभय अपहारी राम कोदंडधारी..|*
*मनन करि मना रे धीर हे वासना रे..|*
*रघुविरभजनाची हे धरी कामना रे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

साऱ्या त्रिभुवनाला तारून त्याच कल्याण करणाऱ्या रामाने त्याच हे कार्य पूर्ण करण्यासाठी अनेक अवतार घेतले,ते घेऊन अनेक कृपापर लीळा या रामप्रभुने केल्या आहेत.

समर्थ रामदास म्हणतात..

मनात विकल्प करणाऱ्या भवाच्या लाटा आणि भयाच्या आशंका यांचा परिहार हा राम कृपारूपी कोदंडाने करतो.

समर्थ रामदास म्हणतात..

अशा रामरायाचे चिंतन हेच खरे मनाचे इप्सित आणि कर्तव्य आहे.आपल्या मनाने हे आपलेसे केले पाहिजे.त्यामुळे मनात धीर पणे वासनांचा उदय होण्याआधी त्यांचं निरसन होईल.

समर्थ रामदास म्हणतात..

या सगळ्यातून आयुष्य कृतार्थ होण्यासाठी रघुनाथाची उपासना हा एकच छंद असला पाहिजे जो जीवनाचा अंतिम ध्यास असला पाहिजे.म्हणून हे मना तू रामोपासनेच लक्ष्य समोर ठेव.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*रघुवरपर आता किर्तनी गुण गावे..|*
*मथन त्रिभुवनाचे सर्व साहित्य फावे..|*
*सकळ जन तरावे वंश ही उद्धरावे..|*
*स्वजन जन करावे रामरूपी भरावे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

रघुनाथाचे गुणवर्णन हे त्याच्या उपासनेत नेहमी आठवावे,त्याचा नेहमी आदर्श घ्यावा.हे आपल्या मनाला,आयुष्याला पूरक असते.

समर्थ रामदास म्हणतात..

त्रिभुवनाच्या साऱ्या या अस्तित्वात त्याचे अस्तित्व,त्याने निर्माण केलेले जीव शिव याचे  वैचारिक मंथन करत तो किती अपरिमित आहे याचा विचार करावा.

समर्थ रामदास म्हणतात..

अशा साऱ्या उपासनेने,रामवृत्तीने स्वतःची,आयुष्याची उत्तम उन्मन अवस्था आणून आपण कृतार्थ होऊया.या रामकृपेने पूर्ण वंश उध्दरून तो उत्तम प्रकारे कार्यफलीत होऊ शकतो.

समर्थ रामदास म्हणतात..

अशा साऱ्या रामदासी समाजाने समूहाने एकत्रित येऊन उदंड संकीर्तन करावे. असा रामउपासनेचा स्वाहाकार आपले परके असे सारे एकत्र येऊन केवळ राममय सृष्टी निर्माण करावी अशी मनाची आर्तता आहे..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*रघुपती गुणरंगे पाविजे भक्तीसंगे..|*
*भजन जनतरंगे सर्व सांडून मागे..|*
*अनुदिन वितरागे योगयागं विरागे..|*
*प्रकट तरत संगे सर्वदासानुरागे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

माझा रामराय मला कसा पाहिजे तर तो सर्व गुणाने युक्त,सर्व दृष्टीने पूर्ण,सर्व वृत्तीने विदेह..!आणि हा परिपूर्ण असा हा रामराजाच्या भक्तीरंगात रंगलेला राम निकट असू दे..!

समर्थ रामदास म्हणतात..

तो स्वतः संकीर्तनात स्वतःला हरवून घेतोच पण त्याबरोबर भक्तगणांना ही तो त्यांचे तापत्रयी विसरून,मागे टाकून परमार्थाच्या सुरेख वाटेवर आणून ठेवतो.

समर्थ रामदास म्हणतात..

या संकीर्तनाने,उपासनेने मी आसक्तीविरहित होत चाललो आहे.योग,तपस्या,अनुष्ठानाने मनातील सर्व प्रकारची आसक्ती नष्ट होउन मन विदेही होत चालल आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

या सगळ्या संकीर्तनाच्या सोहळ्यामध्ये हा राम ही रंगून जातो..!आमच्या सारख्या दासांच्या या सोहळ्यात एक दैवत म्हणून तो असतोच पण आमच्यातला भक्त होऊन ही आमच्यात तल्लीन होऊन जातो.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांची साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*मधुकर मन माझे रामपादांबुजी हो..|*
*सगुण गुण निजांगे नित्य रंगोनि राहो..|*
*अचपळ गुणगुणी बैसली प्रीति दुणी..|*
*शरणचरणभावे जाहला राम ऋणी..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

माझे मन हे रामाच्या चरणापाशी अतिशय आनंदी मानसिक अवस्थेत गढून आहे.हे गढून जाण हे सर्वोच्च अस सुख आहे हे ही मनाला प्रतीत होत आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

हे कायम रामपादुकांशी रंगून गेलेलं मन कायम असेच निजानंदाचा सोहळ्यात रंगून राहो.आणि तो सोहळा आजन्म माझ्याभोवती साजरा होत राहो.

समर्थ रामदास म्हणतात..

कायम रामगुणांच संकीर्तन,मनन याने रामाबद्दलची आत्मीयता अजून वाढू लागली आहे.आणि त्याच संकीर्तनाच कायम मनन करण्यात मन धन्यता मानू लागलं आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

ह्या रामाच्या शरण्यभावाने जसा प्रत्येक पूजनीय त्याची पूजा करणाऱ्याच्या भक्तीत ऋणी असतो.तो त्याच्या भक्तीत, संकीर्तनात तल्लीन असतो तसा राम ही माझ्या या भक्तीत माझा ऋणसखा झाल्याचा भास होतो आहे..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*परमसुखनदीचा मानसी पूर लोटे..|*
*घननिळतनु जेंव्हा अंतरी राम भेटे..|*
*सुख परमसुखाचे सर्व लावण्य साचे..|*
*स्वरूप जगदिशाचे ध्यान त्या ईश्वराचे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

सुखाची एक तरल लाट असते.जी मन समृद्ध करते.जी शरीर,अंतःकरण शुद्ध करते.जी एक निरामय वृत्ती तयार करते.आनंद निर्माण करते.

समर्थ रामदास म्हणतात..

ती लाट,तो ओघ म्हणजे घननिळ वर्णी शरीराराच्या  रामप्रभुचे चिंतनात सगुण रूपाने येणे.राम सगुण रुपात मी करत असलेल्या संकीर्तनात येतो आणि निर्गुणरूपात मला दर्शनाची आवड निर्माण करून देतो.

समर्थ रामदास म्हणतात..

या श्रीरामाच्या अस्तित्वाचे,त्याच्या गुणांच्या स्तुतीचे,त्याच्या पराक्रमाच्या आरतीचे आंतरिक सुख मनामध्ये,विचारांमध्ये उचळंबुन येते.

समर्थ रामदास म्हणतात..

तेच रामाचे दर्शन हे त्या सर्वव्यापी जगदीश्वराचे रूप आहे.सर्व ब्रह्मांडाला व्यापून उरलेल्या निराकार,निरामय परमेश्वराचा तो सगुण असा वावर आहे.त्या परमेश्वराचे ध्यान,स्वरूप म्हणजे हा घननिळ रामच आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२