समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्तोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*तरुणपण देहाचे लोपता वेळ नाही.|*
*तनमनधन अंती वोसरे सर्व काही.|*
*सकळ जन बुडाले व्यर्थ मायाप्रवाही..|*
*झडकरी सुमना रे हित शोधूनी पाही.||*

समर्थ म्हणतात..

देहाला तारूण्य मिळणं हा  निसर्गक्रम आहे.ती दैव देणगी आहे.या काळात सौष्ठव मिळत.गात्र शाक्त होतात.विषयसुख ज्ञान होत.पण आयुष्याची कालगणना केली तर खुपच हे सारं थोड्या काळासाठी असत.

समर्थ म्हणतात...

शरीराचे सौष्ठव व आकृतिबंध,मनाचा विषयसुखाकडे ओघ,ऐश्वर्य  संघटित करायचं कसब आणि उचित काळ हे हळूहळू उभारीला येत जरूर पण संपत जात.उतरत जात.

समर्थ म्हणतात..

सामान्य जन जे या साऱ्या गोष्टींना चिटकून असतात,ते सदोदित या साऱ्या मागे धावत असतात.हे सारे टिकवायचा निरार्थक प्रयत्न करत असतात.आणि हे करता करता स्वतःला निरिच्छ करण्याच्या ऐवजी लिप्त होत आकंठ बुडून जातात..!

समर्थ म्हणतात..

अशा वेळी आपलं मन आहे जे मूलतः सद्गुणी आहे.ईश्वरसंगाच माध्यम आहे.त्याला स्मरून,त्याच मूळ हीत जाणून यथावकाश आपण त्याला कायमच सुखांकीत करण,करायला लावणं हे आपलं कर्तव्य आहे.

समर्थ मनुष्यजन्मातील सुखाच्या काळाच मूल्यमापन करून त्याच्या क्षणभंगुरतेची जाणीव करून देतात.आणि हितकारी अशा मनाचा मागोवा घेत सत्यसुख शोधायची अपेक्षा करतात.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (करुणास्रोत्रे संकीर्ण)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*करुणास्रोत्रे संकीर्ण*

🌺
*चतुरपण जनी हे पाहता आढळेना.|*
*निकट रघुविराचे रूप कैसे कळेना.|*
*चपळमन वळेना गर्वताठा गळेना..|*
*तुजवीण जगदीशा कर्मरेखा टळेना..||*

समर्थ म्हणतात..

मनुष्याकडे जी उपजत भक्तबुद्धी यायला पाहिजे ती बुद्धि माझ्याकडे नाहीये.ते शहाणपण मला माझ्या आयुष्यात आत्मसात करता येत नाहीये.

समर्थ म्हणतात..

सदा सर्वदा कायम माझा सखा,सोबती,चालक,मालक असलेला रामराय इतका जवळ असून ही त्याचे पूर्ण,खरे निर्गुण रूप अजूनही आम्हाला कळत नाहीये..!

समर्थ म्हणतात...

हा रामराया मला पूर्ण कळावा अशी माझीही इच्छा आहे.पण मनाचा चंचलपणा आणि मनातला मी पणाचा गर्व हा कायम रामरायांच्या सख्यतेच्या आड येतोय.

समर्थ म्हणतात...

जोपर्यंत हा जगनियंता मला मिळत नाही..त्याचे सुस्वरूप कळत नाही.जोपर्यंत तो आणि मी वेगळे राहू,आम्ही एकसंग होत नाही तोपर्यंत माझे कर्मभोग माझी पाठ सोडणार नाहीत.मला त्याच चक्रात पुन्हा पुन्हा फिरावं लागेल.

समर्थ रघुवीराचे,परमेश्वराचे स्वतःच्या आणि समस्त मानवांच्या आयुष्यातील स्थानाचे महत्व विशद करून सांगतात.आणि जोपर्यंत त्याची कृपा,त्याची साथ मिळत नाही तोपर्यंत आपली विवशता ही ते सढळ मान्य करतात.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (करुणास्त्रोत्रे संकीर्ण)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*करुणास्रोत्रे* *संकीर्ण*

*रघुविरभजनाची मानसी प्रीति लागो..|*
*रघुवीरस्मरणाची अंतरी वृत्ती जागो..|*
*रघुवीरचरणांची वासना वास मागो..|*
*रघुवीरगुण गाता वाणी ही नित्य रंगो..||१||*

समर्थ म्हणतात..

रघुराजाच संकीर्तन हे मनाची लागलेली गोडी आहे.त्याबद्दलच प्रेम,आसक्ती अशीच राहो त्यात निरंतर वृद्धी होवो.

समर्थ म्हणतात..

रघुराजाच स्मरण हे एक चैतन्य आणणारा स्रोत आहे.तो अंतरी बाळगायची इच्छा आहे.हीच वृत्ती जागती राहो.आणि वाढती ही राहो.

समर्थ म्हणतात..

रघुराजाचे चरण हा एक रम्य असा शुद्ध हव्यास आहे.आणि त्या चरणाशी एकनिष्ठ राहून आयुष्य व्यतीत करणे ही इच्छा..!त्या चरणाचा नित्य सहवास मागावा..!

समर्थ म्हणतात...

रघुराजाच सुनीत संकीर्तन  वर्णन करणं,गायन करणं हे नित्य वाणीची,मनाची शुद्धी आहे.आणि ह्यातच रंगून आयुष्य कृतार्थ करायची सवय ही मनाला लागावी.

समर्थ रघुवीर भजनाची निकड समाजवून सांगताना आयुष्याच्या प्रत्येक क्षणी रघुवीरसंकीर्तन कसे असावे याची ही अपेक्षा समजावून सांगतात.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्त्यांचे साहित्यविश्व (अभंग ९)(भाग २)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग ९*

*भाग २*

*मज सर्वस्वे पाळावे.|*
*प्रतीतीने सांभाळावे.||१||*
*माझी वाईट करणी.*
*रामदास लोटांगणी.||२||*

समर्थ म्हणतात..

रघुराजा...तू मन,शरीर सारे जन्माला घातलेस..!त्यांना निश्चित असे कार्य दिलेस.पंचेंद्रियांना जाणीव दिलीस.ज्ञानेंद्रियांना ज्ञान दिलेस.आता तू या सगळ्यांच ममतेने पालन  कर..!

समर्थ म्हणतात...

हे सगळं आता निश्चित तुझं आहे.तुझ्या संकीर्तनात,तुझ्या पूजनातच  नित्य आहे.आता तूच याचा निश्चित सांभाळ करशील अशी अपेक्षा आहे..!

समर्थ म्हणतात..

तू समवेत असून सुद्धा माझ्या स्वार्थ बुद्धीने मी अनेक वेळा परमार्थात त्रास होईल अशी कामें करतो.चुका करतो.अन्याय करतो.

समर्थ म्हणतात...

या सगळ्याच निराकरण तुझ्या चरणाशीच होईल.हे मी जाणून आहे.म्हणून साष्टांग प्रणिपात करतो. तुझे चरण हेच माझे मुक्तीस्थान आहे.

समर्थ स्वतःची मनमोकळी भूमिका रामरायांचे पुढे मांडतात.जशी भक्ती ही स्वीकार करा असा धावा करतात तसाच झालेल्या ज्ञात,अज्ञात चुकेसाठी क्षमायाचनाही करतात..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांच साहित्यविश्व (अभंग ९)(भाग१)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग ९*

*भाग १*

*अपराधी अपराधी..|*
*आम्हा नाही दृढ बुद्धि.||१||*

*माझे अन्याय अगणित.|*
*कोण करेल गणित..?||२||*

समर्थ म्हणतात...

आम्ही अगणित अशा चुका करतो.मानसिक,सामाजिक,वागणुकीमध्ये.काही आम्हाला कळतात..काही कळत नाहीत.काहिकडे दुर्लक्ष ही होते.

समर्थ म्हणतात...

हे सारे आमच्या मूढपणा मुळे होत.कोणतंही भान आम्हाला राखता येत नाही कारण स्वमग्नते मध्ये मन कायम गुंतलेले असत.अशा ने बुद्धि दृढ रहात नाही.उलट कोती होते.

समर्थ म्हणतात..

या माझ्या मूढ बुद्धीमुळे चुका तर अमाप होतात.या चुका दुसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत चुकीचे ग्रह,एखाद्या प्रसंगाबाबतीत,घटनेबाबतीत त्यातल मर्म न लक्षात येणं यामुळे आमच्या चुका वाढतच चालल्यात.

समर्थ म्हणतात...

या माझ्या दुर्गुणाची परीक्षा करण्यासाठी एक सगुणी व्यक्ती पाहिजे.जी कठोरपणे माझं मूल्यमापन करेल.मला माझ्यातल्या  चुकांच अस्तित्व दाखवून देईल.

समर्थ एका अशा आदर्श व्यक्तीची जीवनात  आवश्यकता आपल्याला सांगतात जो आपली स्वभावशुद्धी,आचरणशुद्धी करून देईल.समर्थ आपल्याला अशी व्यक्ती म्हणून निस्पृह गुरुकडे अंगुलीनिर्देश करत आहेत.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अभंग ८) (भाग ३)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग ८*

*भाग ३*

*तोवरी तोवरी धीरत्वाची मात..*
*प्रपंची आघात झाली नाही.||५||*

*रामदास म्हणे अवघेची गाबाळी.|*
*ऐसा विरळा बळी धैर्यवंत..||६||*

समर्थ म्हणतात..

मनुष्य तोपर्यंत धीर वगैरेंच्या गोष्टी करतो.सहनशीलता,शांतता,संसारखेळ यांची महती गातो.

जोपर्यंत त्याच्या स्वतःच्या आयुष्यात,प्रपंचात संकट येत नाही.अपेक्षेप्रमाणे नाही घडलं तर निराशा येत नाही.जोपर्यंत नाती गोती त्याच्या वैयक्तिक अपेक्षा पूर्ण करत नाहीत.

समर्थ म्हणतात...

इथं या संसारचिंतेत गुरफटलेले,गळफटलेले कधीकधी मनात नसून सुदधा अडकलेले.प्रपंच, जगरहाटी ने त्रस्त असे सगळेच गबाळपंथी आहेत.

असा एखादाच निरक्षीर बुद्धीचा,विवेकी,प्रपंच आणि परमार्थ यांची नेमकी सुवर्णरेश माहीत असलेला धर्मप्रवृत्त माणूस असतो जो या साऱ्यातून तरुन भगवंतप्राप्ती,मोक्षप्राप्ती करून घेऊ शकतो.

समर्थांनी संसारी मनुष्यांचे पूर्ण सत्य सांगताना त्यातले वर्म ही बोट दाखवून वर्णन केले आहे.एकप्रकारचा बेरकीपणा प्रत्येक मनुष्य आपल्या आयुष्यात वापरतो.आणि जेंव्हा हा बेरकीपणा उघडकीला येऊन संसारातील वस्तुस्थिती प्रकट होते तेंव्हा तो परमार्थाची कास धरतो.तोपर्यंत नाही.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अभंग ८)(भाग २)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग ८*

*भाग २*

*तोवरी तोवरी अत्यंत सद्भाव..|*
*विशेषे वैभव आले नाही..||३||*

*तोवरी तोवरी सांगे निराभिमान..|*
*देहाशी अभिमान आला नाही..||४||*

समर्थ म्हणतात...

मनुष्य सद्भावाचा पुतळा असतो,तो सगुणाचे गुण गात असतोतोपर्यंत तो मनुष्य केवळ आणि केवळ सरळ,साधा असतो.


जोपर्यंत त्याच्याकडे इतरांच्या पेक्षा जास्त, उल्लेखनीय धन,श्रीमंती,मानमरातब येत नाही.तो इतरांच्या पेक्षा जास्त काही कमवत नाही.मिळवत नाही तोपर्यंत.

समर्थ म्हणतात...

मनुष्य तोपर्यंत गर्वहरणाचे,निस्पृहते चे गोडवे इतरांसाठी गातो.त्याची महती त्याच्या तोंडात असते.

जोपर्यंत त्याच्या मनात स्वतःच्या शरीराबद्दल ममत्व निर्माण होत नाही.स्वतःच्या अस्तित्वाबद्दल त्याला अभिमान होत नाही.

समर्थांनी मनुष्याच्या स्वभावाचे चूक असणारे बारकावे हेरून त्यावर सुधारणा करण्यासाठी या अभंगात टीका केली आहे.त्यायोगे मनुष्य आपल्यात सुधारणा करू शकेल.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अभंग ८) (भाग १)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग ८*

*भाग १*

*तोवरी तोवरी डगमगिना कदा..|*
*देहाची आपदा झाली नाही.||१||*

*तोवरी तोवरी परमार्थ स्वयंभु..|*
*जव पोटी लोभ आला नाही..||२||*

समर्थ म्हणतात..

मनुष्य तोपर्यंत शूर असतो.आपमग्न असतो.स्वतःच्या गुणगान करण्यात मश्गुल असतो.स्वतःची प्रौढी,योग्यता,आर्थिक स्थिती सांगण्यात पुढे असतो..!

जोपर्यंत देहाला कोणताही त्रास होत नाही.जोपर्यंत स्वतःला मानसिक तोशीस लागत नाही.वार्धक्याची चाहूल लागत नाही.स्वतःच प्राकृत बिघडत नाही..!

समर्थ म्हणतात..

तोपर्यंत आपला संसार,आपले नाते संबंध,आपले गणगोत,आपले सुखासीन जीवन याबाबतीत अतिशय अभिमानी असतो.

जोपर्यंत त्याच्यासमोर कुठल तरी वैभव की जे त्याच्यापेक्षा ही मोहक,उठावदार आणि लोभ होऊ शकेल अस समोर येत  नाही.अशा मनुष्याच स्वमग्नता ही डळमळीत असते.पोकळ असते.

समर्थ मनुष्याच्या नेमक्या स्वभावाच्या वर्मावर बोट ठेवतात.मनुष्याला देव,धर्म,कृपा यांची तेंव्हाच आठवण येते.जेंव्हा तो अस्वस्थ होतो.जोपर्यंत सुख आहे तोपर्यंत तो स्वतःच्या कर्तृत्वात अभिमानी रहातो.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अभंग ७) (भाग २)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग ७*

*भाग २*

*जन्मभरी धरिले तुज हृदयी ..|*
*आता या समयी पावे बा..||३||*

*निष्काम ती तुज सेवायाची आशा..|*
*अंती रामदासा सांभाळावे..||४||*

समर्थ म्हणतात..

रघुराजा...आयुष्यभर तुझे पूजन,तुझी उपासना,तुझा नामजप याशिवाय आम्ही वेगळं काय केलंय रे..?तुझी उपासना,दर्शन म्हणजे आमचा निजध्यास..!तुला हृदयापासून आळवले आहे.तुझे संकीर्तन केले आहे..!

समर्थ म्हणतात...

रघुराजा..या संकीर्तनाचे फळ हे तुझे निरंतर धाम आहे हे आम्ही अनेक सत्पुरुषांकडून ऐकले आहे.आणि ते आम्हाला ही मनापासून पटले आहे.आता तुझी कसोटी आहे की या अंतिम क्षणी तू तुझी ही महती खरी करणार ना..?

समर्थ म्हणतात..

तुझं संकीर्तन, पूजन हे निष्काम करायचं हे आम्हाला अनेक ऋषी,महंत आणि ज्ञानी जनांकडून उमजले आहे.आणी तशीच निर्विकल्प,निष्काम उपासना आमच्याकडून घडावी असा आम्ही प्रयत्न ही केला आहे.

समर्थ म्हणतात..

हे सगळं यासाठी की आयुष्याच्या शेवटच्या क्षणी श्वासांचे स्मरण विसरेल त्यावेळी तुझ्या सस्वरूपात स्थान मिळेल.तू दास म्हणून आमचा सदेह स्वीकार करशील..!आणि या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून वाचवून तुझ्या धामी आम्हाला कायमचा आश्रय देशील..!हो ना रामराया..?

समर्थ निष्काम उपासनेचे अंतिम सकाम फलित इथे समजावत आहेत.तसेच दास्य भक्ती ची परिणीती सख्य भक्तीत कशी होते याचेही विवरण ते या अभंगात प्रस्तुत करत आहेत..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अभंग ६) (भाग २)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग ६*

*भाग २*

*तुज समुदाय दासांचा..*
*परी आम्हा स्वामी कैचा.|*
*तुजसाठी जिवलगांचा.*
*संग सोडीला..||३||*

*सगुण रघुनाथ मुद्दल.*
*माझे हेचि भांडवल..|*
*दास धरून पैलपार..*
*टाकी या भवाचे..||४||*

समर्थ म्हणतात...

रघुराजा..तुझ्याभोवती नेहमीच तुझ्या भक्तांचा मेळा असतो.तुझं संकीर्तन, तुझं पूजन या योगी तुझ्याभोवती कायम योगी,तापस,भक्त यांचा वावर असतो.आणि असणारच..!
हे जरी सत्य आहे तरी मीही तू माझा स्वामी आहेस याच निष्ठेने तुझ्या दारी आलो आहे.तुझ्याशी अनुसंधान जोडून आहे.

समर्थ म्हणतात...

रघुराजा..आम्ही तुझ्या भक्तीच्या आधारे आमचे  सगेसोयरे बाजूला ठेवून तुझ्या पदकमलाच्या सान्निध्यात आलो आहोत.आणि आता निग्रहाने तिथेच आयुष्य वाहून आहोत.

समर्थ म्हणतात...

रघुराजा..कारुण्यसिंधु असा तू राम हीच आमची आता मिळकत,तुझं नाम हेच चलन आणि तुझा आशीर्वाद हीच उपजीविका आहे.तुझी जी वेगवेगळी नामाभिधाने आहेत तीच आमची आता बलस्थाने आहेत.

समर्थ म्हणतात...

रघुराजा..हेच आमचे दास्यत्व आता मान्य कर.आमचा समूळ स्वामी होऊन आमच्या सुकृतातल जे वैगुण्य आहे ते मिटवून घे.आणि आमची की आयुष्याची वाटचाल या भवसागरातून काढून परमार्थाच्या विहंगम अशा तीर्थक्षेत्री आणून आमच्या  आयुष्याचा उद्धार कर.

समर्थांनी रामरायाला सर्वस्व केलं आहे.जगवता,राखता राम तसाच सांप्रत व्यवहार ही राम च आहे.आणि हा व्यवहार पाळून ते परमार्थात मुक्तीचा फायदा करून देण्याची रामरायाकडे प्रार्थना करत आहेत.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अभंग ६) (भाग १)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग ६*

*भाग १*

*रामा तुझ्या स्वामीपणे*
*मानी ब्रम्हांड ठेंगणे..|*
*तुजवीण कोण जाणे..*
*अंतर हे आमुचे..||१||*

*तुजवीण मज माया..*
*नाही नाही रामराया..|*
*आम्हाअनाथा कासया.*
*उपेक्षिसी..||२||*

समर्थ म्हणतात...

रघुराजा तू माझा सर्वकाही आहेस.माझं जीवित्व,माझं व्यक्तित्व,सारे व्यवहार हे तुझ्या आधिपत्याखाली आहेत.तू नियंता आहेस.तू त्राता आणि तूच निवारा आहेस.

समर्थ म्हणतात..

रघुराजा तू माझा स्वामी म्हणजे मी तुझा दास आहे.आणि हे दास्यत्व इतकं विलोभनीय आहे की सर्व सुखाच शिखर स्वर्ग सुख आणि ब्रम्हांड मालकीचं सुख हे खूपच कोत वाटत.अपूर्ण वाटत.हे दास्यत्व म्हणजे सुख,दुःख याच्या पलीकडचा परमानंद म्हणजे हे दास्य सुख आहे.

समर्थ म्हणतात..

रघुराजा..तुझ्याविना कोणत्याही आनंदच मायाजाल हे ठेंगण च आहे.तुझी भक्ती,तुझं पूजन,तुझं नामस्मरण हे सारं या भौतिक मायेच्या पलीकडच मायासुख आहे.आणि माया सुद्धा परब्रम्ह माया असल्याने अलौकिक आणि अतुलनीय आहे.यापेक्षा कोणतीही सुख माया असू शकत नाही.

समर्थ म्हणतात..

रघुराजा..ही तुझी माया,तुझं स्वामित्व मला मान्य आहे.मग परमार्थ मार्गात असे अनाथ अवस्थेत आम्ही का आहोत.?तू आम्हाला अजून पोरकं का ठेवलं आहेस..?का आम्ही असे तुझ्या पूर्ण स्वामीत्वा पासून वेगळे आहोत.?

समर्थ रामकृपा आणि त्याची सावली यांची तुलना शाररिक,मानसिक,सामाजिक मायेसी करतात.आणि त्यात निर्णय देतात की रामाच्या स्वामीपणा पेक्षा या सगळ्या भौतिकतेची किंमत शून्य आहे.त्याचा आयुष्याला काहीही उपयोग नाही.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अभंग ५) (भाग २)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग ५*

*भाग २*

*वेदशास्त्री अर्थ शोधोनी पाहिला..|*
*त्याही निर्धारिला भक्तिभाव..||३||*

*रामी रामदासी भक्तीच मानली..|*
*मने वस्ती केली रामपायी..||४||*

समर्थ म्हणतात..

वेद, उपनिषदे,पुराणे ही सगळी अशा निस्सीम भक्तीचे स्रोत आहेत,ज्यात त्या निर्गुण अशा परमेश्वराची स्तुती आणि सगुणाच पूजन याच वर्णन आहे.आणि या दोन्हीच मूळ ही पराकोटीची भक्तीच आहे.

समर्थ म्हणतात...

अनेक ऋषी,मुनींनी या साऱ्या धर्मसहित्यात भक्तीचे अनेक दाखले,त्याचे त्या त्या काळातील मंत्र,ऋचा यातून होणारे सकृत परिणाम याचीच महती गायलेली आहे.

समर्थ म्हणतात..

आम्ही रामदास झालो हा या भक्तीचाच परिणाम आहे.जी भक्ती वर्षानुवर्षे आमच्या कुळात आहे.जी भक्ती या रामादी अवतारांनी त्या त्या अवतारकाळात अजून बळकट आहे हे या पृथ्वीवर अवतार घेऊन सिद्ध केलं आहे.

समर्थ म्हणतात..

आता ही राममय भक्ती इतकी आयुष्यच एक भाग बनून गेली आहे की तिने मनातील प्रत्येक इच्छेचा ताबा घेतला आहे.या भक्तीचा आधार हा रामचरणाशी एकरूप होईपर्यंत असेल इतकी ती मनात सुदृढ झाली आहे.

समर्थ निस्सीम भक्तीचा आदर्श घालून देतायत.भक्तीचे अध्यात्मातील स्थान,परमार्थामध्ये योग्य अशी वाटचाल ही भक्ती आचरून हे आयुष्य सफल आणि सुनंदन करून देते अस समर्थ सांगतात.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२